शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

कांद्यानंतर आता बटाट्याचाही तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 05:52 IST

तीन महिन्यांत दर दुप्पट : एपीएमसीमध्ये बाजारभाव २५ रुपयांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कांद्यानंतर आता बटाट्याचीही टंचाई सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन महिन्यांत भाव दुप्पट झाले आहेत. सद्य:स्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये बटाटा १८ ते २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत.पावसाळा लांबल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारभावावर होऊ लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून देशभर कांदाटंचाई सुरू आहे. यानंतर आता बटाट्याचे दरही वाढू लागले आहेत. सप्टेंबरमध्ये बाजार समितीमध्ये ८ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने बटाट्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर १८ ते २५ रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ३० ते ४० रुपयांवर गेले आहेत.सद्य:स्थितीमध्ये इंदोरमधून नवीन बटाटा विक्रीसाठी येत आहे. उत्तर प्रदेश व गुजरातमधूनही आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर वाढत असल्याची माहिती बटाटा व्यापारी महादेव कळमकर यांनी दिली.कांदा दरामध्ये घसरणमुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दरही काही प्रमाणात नियंत्रणात आले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ७० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. उन्हाळी कांद्याची आवक जवळपास बंद झाली आहे. या स्थितीमध्ये पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेशमधून कांद्याची आवक सुरू आहे.