शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कांद्यानंतर आता बटाट्याचाही तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 05:52 IST

तीन महिन्यांत दर दुप्पट : एपीएमसीमध्ये बाजारभाव २५ रुपयांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कांद्यानंतर आता बटाट्याचीही टंचाई सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन महिन्यांत भाव दुप्पट झाले आहेत. सद्य:स्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये बटाटा १८ ते २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत.पावसाळा लांबल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारभावावर होऊ लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून देशभर कांदाटंचाई सुरू आहे. यानंतर आता बटाट्याचे दरही वाढू लागले आहेत. सप्टेंबरमध्ये बाजार समितीमध्ये ८ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने बटाट्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर १८ ते २५ रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ३० ते ४० रुपयांवर गेले आहेत.सद्य:स्थितीमध्ये इंदोरमधून नवीन बटाटा विक्रीसाठी येत आहे. उत्तर प्रदेश व गुजरातमधूनही आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर वाढत असल्याची माहिती बटाटा व्यापारी महादेव कळमकर यांनी दिली.कांदा दरामध्ये घसरणमुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दरही काही प्रमाणात नियंत्रणात आले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ७० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. उन्हाळी कांद्याची आवक जवळपास बंद झाली आहे. या स्थितीमध्ये पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेशमधून कांद्याची आवक सुरू आहे.