शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

सेबीच्या नोटिशीनंतर सहकारमंत्री नरमले

By admin | Updated: August 17, 2016 18:40 IST

लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 17 - लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे. मात्र यात कोणताही गैरव्यवहार नाही. कदाचित अनियमितता किंवा तांत्रिक चूक असू शकेल, असा खुलासा राज्याचे सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना केला. लोकमंगल अ‍ॅग्रो कंपनीने साखर उद्योग उभारणीसाठी ४ हजार ७५१ शेतकरी गुंतवणूकदारांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपयांचे शेअर्स (भाग भांडवल) जमा केल्याप्रकरणी सेबीने मंत्री सुभाष देशमुखांसह कंपनीच्या १२ संचालकांना नोटिसा बजावल्या होत्या. ही रक्कम शेतकऱ्यांना सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्याच बरोबर कंपनीच्या संचालकांना रोखे बाजारात व्यवहार बंदी करण्याचे आदेश सेबीकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमंगलचे सर्वेसर्वा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वरील खुलासा केला.

ते म्हणाले, लोकमंगलने कारखान्यासाठी गावोगाव फिरुन शेअर्स गोळा केले आहेत. एका दिवशी ३९ पेक्षा अधिक सभासदांना शेअर्स विक्री करता येत नाही. ही तांत्रिक अडचण होती. त्यामुळे शेअर्स विक्रीत कदाचित अनियमितता आली असेल. पण यात कसलीही फसवणूक केली नाही. कायद्याचे अज्ञान असल्यामुळे काही चुका झाल्याची कबुली देशमुख यांनी दिली. सेबीने शेतकऱ्यांना शेअर्सच्या रकमा व्याजसह परत करण्याचे आदेश दिले असतील. तर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरणही देशमुख यांनी दिले. या प्रकरणात गैरव्यवहार झाला नाही, कोणत्याही बँकेने तशी तक्रार केली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून राजीखुशीने शेअर्स जमा केले आहेत. त्याचा हिशोब ठेवण्यात काहीसी गडबड असू शकेल. पण कोणाचीही फसवणूक केली, असे म्हणता येणार नाही. सेबीच्या नोटिसीला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सुब्रतो रॉयशी तुलना चुकीची !लोकमंगल अ‍ॅग्रो शेअर्स संकलन आणि सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांच्या व्यवहाराशी तुलना केली जात आहे. याबद्दल खंत व्यक्त करीत देशमुख म्हणाले, ही तुलना चुकीची आहे. सहारा समुहाने गुंतवणूकदारांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. त्यात गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकमंगलने शेतकऱ्यांकडून ठेवी नव्हे तर शेअर्सची रक्कम स्वीकारली आहे. शेअर्सधारक त्या कंपनीचे मालक असतात. ठेवीदारांबाबत तसे म्हणता येत नाही. सेबीच्या नोटिशीवर कायदेशीर उत्तर देणार आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देणार नाही. यासंदर्भात माझे कामच बोलेल. यापूर्वी लोकमंगल बँकेवरही असेच गंभीर आरोप झाले होते. मला आरोप नवीन नाहीत. -सुभाष देशमुखसहकार, पणनमंत्री