शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे; अभिनेता अतुल कुलकर्णीचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:11 IST

माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही..

ठळक मुद्दे‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय पुस्तकाचे प्रकाशनस्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकवले जात नाही, लिंगभेद, जातीभेद

पुणे : पर्यावरणाचे बदल होत असताना, त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलणे आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे. मूल जन्माला आले की, वस्तूंचा वापर सुरू होतो. आता वाढलेली लोकसंख्या रोखू शकत नाही. पण पर्यावरणाला वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियम बदलले पाहिजेत. लग्न केलं म्हणजे आता मूल झालंच पाहिजे. हे बदलायला हवे. मूल जन्माला घालणं बंद करायला हवे, अशी उदविग्नता संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही, त्यासाठी हे एक कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनोविकास प्रकाशन आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित  ‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय ना... या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक अतुल देऊळगावकर, चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, अरविंद पाटकर, आशिष पाटकर उपस्थित होते. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटले आहे. मागे वळून बघताना आपले काय चुकले, हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या जशाच्या तशा येणाºया पिढीवर लादणार आहोत आहोत? शांतपणे आता वेळ आलीय आमचं चुकलं हे कबुल करण्याची, गाडी बंगला हे महत्त्वाचे वाटत आहे. स्पर्धेला महत्त्व दिले जात आहे. आजकाल तर खूप स्पर्धा आहे, असा पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो. हेच आपण मुलांना शिकवतोय. आजकाल आपण खूप बिझी झालोय. बिझी हे यशस्वीतेचे लक्षण समजले जातेय. पुस्तकातून भेदभावापेक्षा निसर्ग संवर्धनाचे शिक्षण द्यावे 

स्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून लिंगभेद, जातीभेद शिकवले जात नाही, तर निसर्गाचा, लोकशाहीचा आदर कसा करावा, हे शिकवले जाते. म्हणून तिकडची मुले समंजस आहेत. आपल्याकडे शिक्षणातून निसर्ग शिकवला पाहिजे. आता विज्ञान न सांगता प्रत्यक्ष कृती शिकवायला हवी, असे देऊळगावकर यांनी सांगितले. ........

अतुल देऊळगावकर म्हणाले, येत्या २०५० पर्यंत आपण कार्बन उत्सर्जन शून्यावर आणायला हवे. अन्यथा २१ व्या शतकात तापमान ४ अंशाने वाढणार आहे. गेल्या आठवड्यात वैज्ञानिकांनी सांगितले की, हा उन्हाळा सर्वांत कडक असेल. दिल्लीतील प्रदूषण आपण जाणतोच. वैज्ञानिक सांगतात की, २.५ मायक्रॉन आकाराचे घन कण आपल्या फुप्फुसात जातात. परिणामी धुम्रपान न करणाºयांनाही कर्करोग होऊ शकतो. तसेच नाकातून हे कण गेल्याने मेंदूवर परिणाम करतात आणि मनोविकार होतात. आत्महत्या करण्याचे विचारही येतात. .......

लोक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बोगद्यातून उलट्या दिशेने वाहने चालवतात. त्यांना इतरांच्या जिवाची पर्वा तर नाहीच, पण किमान स्वत:च्या जिवाची तरी पर्वा करायला हवी ना? ग्रेटा म्हणते, मी आशावादी नाहीय. पण अस्वस्थ आहे. प्रत्येकाने आशावादी राहिले नाही तरी चालेल, परंतु अस्वस्थ जरूर असावे. मी कमी झाडं तोडली तर समोरची लोकं खूप झाडं तोडत आहेत. मग मी त्यांच्या मागे का राहू? अशी स्पर्धा घातक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.....

मी खूप निराशावादी आहे, असं वाटत असेल. परंतु हा निराशावाद नाही, तर रिअ‍ॅलिटी चेक आहे. प्रत्येकात सकारात्मकता हवी. पण त्यांनी अगोदर रिअ‍ॅलिटी चेक करावी. आज हे अनेकजण विसरूनच गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेAtul Kulkarniअतुल कुलकर्णीenvironmentपर्यावरण