शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे; अभिनेता अतुल कुलकर्णीचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:11 IST

माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही..

ठळक मुद्दे‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय पुस्तकाचे प्रकाशनस्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकवले जात नाही, लिंगभेद, जातीभेद

पुणे : पर्यावरणाचे बदल होत असताना, त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलणे आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे. मूल जन्माला आले की, वस्तूंचा वापर सुरू होतो. आता वाढलेली लोकसंख्या रोखू शकत नाही. पण पर्यावरणाला वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियम बदलले पाहिजेत. लग्न केलं म्हणजे आता मूल झालंच पाहिजे. हे बदलायला हवे. मूल जन्माला घालणं बंद करायला हवे, अशी उदविग्नता संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही, त्यासाठी हे एक कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनोविकास प्रकाशन आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित  ‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय ना... या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक अतुल देऊळगावकर, चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, अरविंद पाटकर, आशिष पाटकर उपस्थित होते. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटले आहे. मागे वळून बघताना आपले काय चुकले, हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या जशाच्या तशा येणाºया पिढीवर लादणार आहोत आहोत? शांतपणे आता वेळ आलीय आमचं चुकलं हे कबुल करण्याची, गाडी बंगला हे महत्त्वाचे वाटत आहे. स्पर्धेला महत्त्व दिले जात आहे. आजकाल तर खूप स्पर्धा आहे, असा पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो. हेच आपण मुलांना शिकवतोय. आजकाल आपण खूप बिझी झालोय. बिझी हे यशस्वीतेचे लक्षण समजले जातेय. पुस्तकातून भेदभावापेक्षा निसर्ग संवर्धनाचे शिक्षण द्यावे 

स्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून लिंगभेद, जातीभेद शिकवले जात नाही, तर निसर्गाचा, लोकशाहीचा आदर कसा करावा, हे शिकवले जाते. म्हणून तिकडची मुले समंजस आहेत. आपल्याकडे शिक्षणातून निसर्ग शिकवला पाहिजे. आता विज्ञान न सांगता प्रत्यक्ष कृती शिकवायला हवी, असे देऊळगावकर यांनी सांगितले. ........

अतुल देऊळगावकर म्हणाले, येत्या २०५० पर्यंत आपण कार्बन उत्सर्जन शून्यावर आणायला हवे. अन्यथा २१ व्या शतकात तापमान ४ अंशाने वाढणार आहे. गेल्या आठवड्यात वैज्ञानिकांनी सांगितले की, हा उन्हाळा सर्वांत कडक असेल. दिल्लीतील प्रदूषण आपण जाणतोच. वैज्ञानिक सांगतात की, २.५ मायक्रॉन आकाराचे घन कण आपल्या फुप्फुसात जातात. परिणामी धुम्रपान न करणाºयांनाही कर्करोग होऊ शकतो. तसेच नाकातून हे कण गेल्याने मेंदूवर परिणाम करतात आणि मनोविकार होतात. आत्महत्या करण्याचे विचारही येतात. .......

लोक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बोगद्यातून उलट्या दिशेने वाहने चालवतात. त्यांना इतरांच्या जिवाची पर्वा तर नाहीच, पण किमान स्वत:च्या जिवाची तरी पर्वा करायला हवी ना? ग्रेटा म्हणते, मी आशावादी नाहीय. पण अस्वस्थ आहे. प्रत्येकाने आशावादी राहिले नाही तरी चालेल, परंतु अस्वस्थ जरूर असावे. मी कमी झाडं तोडली तर समोरची लोकं खूप झाडं तोडत आहेत. मग मी त्यांच्या मागे का राहू? अशी स्पर्धा घातक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.....

मी खूप निराशावादी आहे, असं वाटत असेल. परंतु हा निराशावाद नाही, तर रिअ‍ॅलिटी चेक आहे. प्रत्येकात सकारात्मकता हवी. पण त्यांनी अगोदर रिअ‍ॅलिटी चेक करावी. आज हे अनेकजण विसरूनच गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेAtul Kulkarniअतुल कुलकर्णीenvironmentपर्यावरण