शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 09:18 IST

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Maharashtra Political Crisis, Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे आणि वरच्या फळीतील नेते अजित पवार यांनी बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना वेगळी वाट करून देत त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेत्यांच्या हजेरीत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर अजित पवारांनी दावा सांगितला. ते म्हणाले, 'आम्ही सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढू.' अजित दादांनी महाराष्ट्रात बंड केले असताना, आता आणखी एका राज्यातही असाच प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांनी भाजप-शिवसेना सत्ताधारी युतीशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेले. या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारबाबत फार मोठी गोष्ट सांगितली. रामदास आठवले म्हणाले, "अजित पवार हे मातीतील नेते आहेत. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा खेळ आता संपलाय. महाराष्ट्रात जसे घडले, तसेच बिहारमध्येही होणार आहे."

रामदास आठवले यांच्या विधानावर फारशी चर्चाही झाली नव्हती, तितक्यात बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी घराणेशाही हे राष्ट्रवादीच्या फुटीचे कारण असल्याचे स्पष्ट केले. सम्राट चौधरी म्हणाले, जिथे जिथे असे नेते आहेत जे केवळ कुटुंबाला पुढे नेण्यासाठी राजकारण करत आहेत, त्या नेत्यांच्या पक्षाची आता अशीच अवस्था होणार आहे, असे सूचक वक्तव्य केले.

महाराष्ट्रासारखी परिस्थिती बिहारमध्येही होऊ शकते!

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा दावा केला. "शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीतील बंडखोरी हे विरोधी पक्षाच्या पाटण्यातील बैठकीमुळेच झाले. राहुल गांधींना मोठे नेते प्रोजेक्ट करण्यासाठी येथे मोर्चेबांधणी केली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एक गट नाराज झाला. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे समजून नितीशकुमार आमदारांशी वैयक्तिकरित्या बोलत आहेत," असे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेBiharबिहार