शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 09:18 IST

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Maharashtra Political Crisis, Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे आणि वरच्या फळीतील नेते अजित पवार यांनी बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना वेगळी वाट करून देत त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेत्यांच्या हजेरीत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर अजित पवारांनी दावा सांगितला. ते म्हणाले, 'आम्ही सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढू.' अजित दादांनी महाराष्ट्रात बंड केले असताना, आता आणखी एका राज्यातही असाच प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांनी भाजप-शिवसेना सत्ताधारी युतीशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेले. या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारबाबत फार मोठी गोष्ट सांगितली. रामदास आठवले म्हणाले, "अजित पवार हे मातीतील नेते आहेत. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा खेळ आता संपलाय. महाराष्ट्रात जसे घडले, तसेच बिहारमध्येही होणार आहे."

रामदास आठवले यांच्या विधानावर फारशी चर्चाही झाली नव्हती, तितक्यात बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी घराणेशाही हे राष्ट्रवादीच्या फुटीचे कारण असल्याचे स्पष्ट केले. सम्राट चौधरी म्हणाले, जिथे जिथे असे नेते आहेत जे केवळ कुटुंबाला पुढे नेण्यासाठी राजकारण करत आहेत, त्या नेत्यांच्या पक्षाची आता अशीच अवस्था होणार आहे, असे सूचक वक्तव्य केले.

महाराष्ट्रासारखी परिस्थिती बिहारमध्येही होऊ शकते!

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा दावा केला. "शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीतील बंडखोरी हे विरोधी पक्षाच्या पाटण्यातील बैठकीमुळेच झाले. राहुल गांधींना मोठे नेते प्रोजेक्ट करण्यासाठी येथे मोर्चेबांधणी केली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एक गट नाराज झाला. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे समजून नितीशकुमार आमदारांशी वैयक्तिकरित्या बोलत आहेत," असे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेBiharबिहार