शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जानकरांनंतर आणखी एक मित्रपक्ष भाजपावर नाराज; स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 09:34 IST

मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं कडू यांनी सांगितले. 

नागपूर - एनडीएच्या बैठकीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. जेव्हा एखादी निवडणूक लढतो तेव्हा प्रत्येक घटकाला विचारलं जाते ती भूमिका भाजपाची दिसत नाही. आम्हाला त्याची फार गरजही वाटत नाही. आम्ही महायुतीत आहे की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आमची लढण्याची तयारी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात ३००-४०० उमेदवार आम्ही उभे करू असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही स्वाभिमानी आहोत, कुणालाही कुणाचा पक्ष संपवण्याची ताकद नसते. कापसाचा भाव, घरकुल, मजुराचा प्रश्न आहेत. आम्ही कुणाला मतदान देतो ते पाहायला मिळावे यासाठी आम्ही अभियान राबवणार आहोत. गरज असते तर ४ फोन केले असते. विधान परिषदेची, राज्यसभेची निवडणूक असते तेव्हा आम्हाला फोन करून विचारले जाते. परंतु ते झाल्यानंतर कुणी विचारत नाही हे २० वर्षापासून अनुभवतोय. मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्री शिंदेंसोबत आम्ही चर्चा करणार नाही. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही चर्चा करू, पण आम्हाला चर्चेची गरज वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचा पक्ष मोठा असला तरी आमचा पक्ष, आमची विचारधारा आहे. त्या विचारधारेने आम्ही पुढे जातो. EVM मशिनमुळे आमचे मत कुणाला जाते हे कळत नाही. त्यामुळे मी खासदार म्हणून अभियान राबवू प्रत्येक मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार उभे करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपाकडे काही जागांची मागणी केली होती, पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते रासपचे उमेदवार होते आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४