शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, धनगर आरक्षणाच्या अहवालानंतरच कामकाज!;अजित पवारांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 02:43 IST

मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील अहवाल विधिमंडळात सादर होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत याच मुद्द्यावर गदारोळ सुरू असताना दिला.

मुंबई : मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील अहवाल विधिमंडळात सादर होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत याच मुद्द्यावर गदारोळ सुरू असताना दिला. गदारोळातच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज गुंडाळले. पहिल्या आठवड्यातील तिन्ही दिवसांचे कामकाज गदारोळातच वाहून गेले.मराठा समाजाच्या आरक्षणावरून विरोधी पक्ष सदस्य प्रचंड आक्रमक होते. अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन त्यांनी घोषणाबाजी केली. तुम्ही असेच वागलात तर कारवाई करावी लागेल, असा दमही अध्यक्षांनी दिला पण गोंधळ सुरूच होता. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून आरक्षणावर चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावून धरली. सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणासाठी भविष्यात न्यायालयात लढावे लागेल हे गृहीत धरूनच या कायद्याची मजबूत रचना करण्यात आली आहे. याच अधिवेशनात या आरक्षणाचे विधेयक मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकार केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे लवकरात लवकर करेल. आघाडी सरकारच्या काळात शिफारस फेटाळण्यात आली होती, असे त्यांनी म्हणताच विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला.आपले सरकार आले तर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ या फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण अजित पवार, शेकापचे गणपतराव देशमुख यांनी करून दिली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असताना बारामतीच्या सभेत मी तसे म्हणालो होतो, पण आधीच्या सरकारने केलेली शिफारस केंद्राने फेटाळली होती, याची मला कल्पना नव्हती. आम्ही ‘टिस’मार्फत अहवाल तयार करून आता शिफारस करणार आहोत.

पवारांची भूमिका ३६० अंशात का बदलली - शेलारमराठा आरक्षणाचा अहवाल विधानसभेत मांडण्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भूमिका दोनच दिवसांत ३६० अंशात कशी काय बदलली, असा सवाल भाजपाचे आशिष शेलार यांनी केला. त्यावर, सरकारच या अहवालाबाबत संभ्रम निर्माण करीत आहे. मी शब्द बदलणारा माणूस नाही, असे पवार यांनी सुनावले. शेलार यांनी विसंगतीवर नेमके बोट ठेवले. त्यावर पवार म्हणाले की, माझी नाही तर सरकारचीच संभ्रमावस्था झाली आहे. मी शब्द बदलणारा माणूस नाही, असेही त्यांनी सुनावले.

आरक्षण विरोधकांच्या हातात कोलीत देऊ नका - तावडेआरक्षणास विरोध असलेल्या लोकांच्या हातात कोलीत मिळेल, असे वक्तव्य आपण तरी करू नये, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले. आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.अहवाल स्वीकारला की शिफारशी?मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे की केवळ शिफारशी स्वीकारल्या आहेत, असा सवाल अजित पवार यांनी केला. वृत्तपत्रांत आलेल्या बातमीचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर, मुख्यमंत्री म्हणाले की, कायद्यानुसार मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत सरकार निर्णय घेईल. या निर्णयानंतर सरकार वार्षिक अहवाल प्रसिद्ध करेल, त्यामध्ये स्वीकारलेल्या आणि नाकारलेल्या शिफारशींबाबत सकारण माहिती देईल. कायद्यानुसार अहवालावर नव्हे तर अहवालात देण्यात आलेल्या शिफारशींवर मंत्रिमंडळाला निर्णय घ्यावा लागतो. त्यानुसार या शिफारशी स्वीकारल्याचे आम्ही न्यायालयाला सांगितले.संसदेने कायदा केला तरच आरक्षण टिकेल - आठवलेआरक्षणाला न्यायालयात विरोध झाल्यास ते टिकू शकणार नाही, यासाठी मराठा आरक्षणाचा कायदा हा संसदेतच व्हायला हवा. स्वत: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा आणि सवर्णांना शिक्षण व नोकºयांमध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा संसदेत मांडणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा