शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंडे यांच्यानंतर आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Updated: March 5, 2025 10:54 IST

Sanjay Raut on Jaykumar Gore: जयकुमार गोरे यांच्याबाबत जी माहिती समोर आली ती महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे अशी टीकाही संजय राऊतांनी केली. 

मुंबई - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्या जवळचे मंत्री असल्याने धनंजय मुंडे वादात अडकले. गेल्या २ महिन्यापासून हे प्रकरण चर्चेत असताना संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाले आणि राज्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र आता या प्रकरणानंतर महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात आले आहेत. एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप या मंत्र्‍यावर करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. १० दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन १० हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्‍यांची यादी रोज वाढत चालली आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी केला. 

तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्र्‍याचे नाव घेत सरकारला टार्गेट केले. सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत अत्यंत गंभीर, स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे. भाजपाचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येतोय. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्‍याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आले. ही महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान,  संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आता हे पात्र नवीन निर्माण झाले आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची झाडाझडती घेतली पाहिजे. कुणाचं नक्की काय आहे हे समोर आले पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याबाबत जी माहिती समोर आली ती महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे अशी टीकाही संजय राऊतांनी केली. 

असे विकृत मंत्री महाराष्ट्रात नको..

महाराष्ट्रात असे विकृत मंत्री नको, जर असा मंत्री मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला दूर करणे सरकारचं कर्तव्य आहे. चांगली लोक महाराष्ट्रात नाही का, शोधून शोधून एक एक नग मंत्रिमंडळात का भरले जातात असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारJaykumar Goreजयकुमार गोरेSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMolestationविनयभंग