शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

"देशात २०१४ पासून हिंदू ओळखले जायला लागले का?"; अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:25 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला देेवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गटाने पलटवार केला आहे.

Ambadas Danve on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन विधानसभेला त्या चुका टाळण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह  विधानसभा निवडणुकीसाठी  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधत ते महाराष्ट्राला संपवण्यासाठी येत असल्याचे म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी आरशात चेहरा पाहून घ्यावा असं प्रत्युत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आता ठाकरे गटाने पलटवार केला आहे.

नागपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजपाकडूनही उद्धव ठाकरे यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं गेलं. हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती, ती पुसण्याचा प्रयत्न झाला होता. ५०० वर्षांनंतर तो प्रयत्न मोडून टाकणारे अमित शाह हे आमचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकदा आपला चेहरा आकशात पाहून घ्यावा, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.

आता फडणवीसांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. "हो का देवेंद्र फडणवीसजी? म्हणजे या देशातील हिंदू हे हिंदू म्हणून २०१४ सालापासून ओळखले जायला लागले का? मग या ५०० वर्षांच्या कालखंडात हिंदूंची ओळख जपणारे आणि प्रसंगी बलिदान देणारे वीर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे झंझावाती नेते तुमच्या लेखी काल्पनिक पात्र आहेत म्हणजे!," असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल," असे उद्धव ठाकरे यांनी नागपुरातल्या सभेत म्हटलं होतं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहAmbadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा