शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

दिल्ली पाठोपाठ 'पुणे' सर्वाधिक प्रदूषित शहर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:14 IST

देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली पाठोपाठ पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरमाहितीच्या अधिकारात धक्कादायक  बाब उघड

पुणे : देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. वायू प्रदूषण हि आपल्या देशाच्या महानगरातील प्रमुख समस्या आहे. वायू प्रदुषणासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. यामधून अनेक घातक वायू बाहेर पडतात त्या अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक  नायट्रोजन डाय ओक्ससाईड (NO2) हा वायू सर्वात विघातक मानला जातो. वायू प्रदूषण मोजताना नायट्रोजन डायओक्ससाईड चे त्या हवेत प्रमाण किती आहे त्यावरून ती हवा किती प्रदूषित आहे हे समजते.

        सन २०१० ते २०१७ या कालावधीत देशात नायट्रोजन डायओक्ससाईड ची म्हणजे “नॉक्स लेवल” चे प्रमाण देशाच्या प्रमुख महानगरात किती आहे याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते सीए.आदित्य राठी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे  माहितीच्या अधिकारात मागितली  होती. त्यामध्ये जी माहिती त्यांना प्राप्त झाली त्याचा अभ्यास करून दिल्ली शहरात हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली खालोखाल पुणे शहरात या कालावधीमध्ये सर्वाधिक नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण आढळल्याचे मिळालेल्या माहितीतून सिद्ध झाले.

      राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकानुसार सरासरी वार्षिक एक शहरामध्ये हे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर पेक्षा जास्त असता काम नये पण दिल्ली आणि पुण्यात हे प्रमाण दुपटीने आढळून आल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. जर आपल्या हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड या वायूचे प्रमाण दुपटीने असेल तर नक्कीच हि आपल्या शहरासाठी धोकादायक बाब असल्याचे आदित्य राठी यांनी नमूद केले. काही दिवसापूर्वीच केंदीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने देशात राहण्यासाठी योग्य अश्या १११ शहराची यादी प्रसिद्ध केली होती त्यात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याचे नाव पुढे आले होते. ज्या शहरात वायू प्रदूषण सर्वाधीक असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड होत असेल तर ते शहर राहण्यासाठी उत्तम शहर कसे असू शकते ? असा सवाल राठी यांनी उपस्थित केला आहे.

       दिवसेंदिवस वाढत जाणारे औद्द्योगीकरण, इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या या वायू पृदुषणाला जबाबदार असल्याचे राठी यांनी सांगितले. आपण जर वेळीच या गोष्टींवर आळा घातला नाही तर पुण्यातील हे वायू प्रदूषण वाढत जाईल आणि लवकरच आपण दिल्ली शहराला मागे टाकून सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून देशात प्रथम क्रमांकावर जाऊ शकतो अशी भीती राठी यांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी सायकलींचे शहर असे बिरुद मिरविणारे आपल्या पुणेकरांना  भविष्यात सर्वाधिक प्रदूषित शहर असे हिनवले जाऊ नये हीच माझी ईच्छा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे राठी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषण