शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दिल्ली पाठोपाठ 'पुणे' सर्वाधिक प्रदूषित शहर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:14 IST

देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली पाठोपाठ पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरमाहितीच्या अधिकारात धक्कादायक  बाब उघड

पुणे : देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. वायू प्रदूषण हि आपल्या देशाच्या महानगरातील प्रमुख समस्या आहे. वायू प्रदुषणासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. यामधून अनेक घातक वायू बाहेर पडतात त्या अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक  नायट्रोजन डाय ओक्ससाईड (NO2) हा वायू सर्वात विघातक मानला जातो. वायू प्रदूषण मोजताना नायट्रोजन डायओक्ससाईड चे त्या हवेत प्रमाण किती आहे त्यावरून ती हवा किती प्रदूषित आहे हे समजते.

        सन २०१० ते २०१७ या कालावधीत देशात नायट्रोजन डायओक्ससाईड ची म्हणजे “नॉक्स लेवल” चे प्रमाण देशाच्या प्रमुख महानगरात किती आहे याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते सीए.आदित्य राठी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे  माहितीच्या अधिकारात मागितली  होती. त्यामध्ये जी माहिती त्यांना प्राप्त झाली त्याचा अभ्यास करून दिल्ली शहरात हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली खालोखाल पुणे शहरात या कालावधीमध्ये सर्वाधिक नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण आढळल्याचे मिळालेल्या माहितीतून सिद्ध झाले.

      राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकानुसार सरासरी वार्षिक एक शहरामध्ये हे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर पेक्षा जास्त असता काम नये पण दिल्ली आणि पुण्यात हे प्रमाण दुपटीने आढळून आल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. जर आपल्या हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड या वायूचे प्रमाण दुपटीने असेल तर नक्कीच हि आपल्या शहरासाठी धोकादायक बाब असल्याचे आदित्य राठी यांनी नमूद केले. काही दिवसापूर्वीच केंदीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने देशात राहण्यासाठी योग्य अश्या १११ शहराची यादी प्रसिद्ध केली होती त्यात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याचे नाव पुढे आले होते. ज्या शहरात वायू प्रदूषण सर्वाधीक असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड होत असेल तर ते शहर राहण्यासाठी उत्तम शहर कसे असू शकते ? असा सवाल राठी यांनी उपस्थित केला आहे.

       दिवसेंदिवस वाढत जाणारे औद्द्योगीकरण, इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या या वायू पृदुषणाला जबाबदार असल्याचे राठी यांनी सांगितले. आपण जर वेळीच या गोष्टींवर आळा घातला नाही तर पुण्यातील हे वायू प्रदूषण वाढत जाईल आणि लवकरच आपण दिल्ली शहराला मागे टाकून सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून देशात प्रथम क्रमांकावर जाऊ शकतो अशी भीती राठी यांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी सायकलींचे शहर असे बिरुद मिरविणारे आपल्या पुणेकरांना  भविष्यात सर्वाधिक प्रदूषित शहर असे हिनवले जाऊ नये हीच माझी ईच्छा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे राठी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषण