शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:07 IST

मी ओबीसी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची मागणी आहे असं वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई – राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, प्रत्येकजण वेगवेगळी भूमिका मांडतो, पण सरकार म्हणून भूमिका काय? मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ओबीसी नेते म्हणून भुजबळ जी भूमिका मांडतायेत, ती स्वाभाविक ओबीसी म्हणून माझीही भावना आहे. तुम्ही ज्या प्रकारे सरकार म्हणून हे प्रकरण हाताळतायेत, मराठवाड्यापुरती मर्यादा असताना त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जीआर काढला. आता सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होतेय त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे असं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काही आमदारांनी मंत्रालयाला कुलुप लावले. सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकार म्हणजे नियंत्रण चुकलेले जहाज आहे, ते बुडण्याच्या स्थितीत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसीबाबत सरकारची भूमिका काय? तुम्ही आपसांत भांडवून हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे का? महाराष्ट्रात आग लावायची आहे का? मराठाविरुद्ध ओबीसी उभा करून तुम्ही महाराष्ट्राची तिजोरी साफ करण्यासाठी टपून बसला आहात का? सरकारची तिजोरीत खणखणाट आहे. मुंबई महापालिकेच्या FD संपल्या, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. महाराष्ट्रात लूट सुरू आहे. असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मी ओबीसी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांचीही मागणी तीच आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तेच सांगितले. सर्वपक्षीय बैठकीत ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देणार नाही असं म्हटलं. आम्हाला ओबीसी नेत्यांना टार्गेट केले गेले, धमक्या येऊ लागल्या. ओबीसीत आल्यानंतर सगळं आलबेल होणार असं वाटतंय, अनेक जातींना स्वत:ची घरे नाही, इतकी वाईट अवस्था आहे. वाड्यापाड्यावर ८ दिवस पाणी येत नाही. सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात, ते कोण तर ओबीसी आहे. ओबीसीमुळे सर्वकाही मिळते असा गैरसमज आहे. तुम्हाला आरक्षण हवं तर वेगळा प्रवर्ग घ्या, ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण कसं मिळेल. गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सरकार भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण दुषित होतंय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम करतायेत, तसं ओबीसी नोंदी शोधण्याचं काम करून श्वेतपत्रिका काढावी. ओबीसी समाजाला लाभापासून वंचित राहावे लागते. ओबीसीवर श्वेतपत्रिका काढावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याला १०० टक्के विरोध आहे. सरकारने स्पष्टता आणली पाहिजे हा वाद वाढू नये असा तोडगा काढला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यांना आरक्षण द्या, सरकार वाद वाढवतंय. दोन समाजात दुही निर्माण करतायेत. एकाच मंत्रिमंडळाचे २ मंत्री वेगवेगळी भूमिका घेतात. महाराष्ट्राला अस्थिर होण्याच्या परिस्थितीतून बाहेर काढावे अशी आमची मागणी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChhagan Bhujbalछगन भुजबळ