शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

इभ्रतीपुढे उतारवयातील परवड फिकी! मुलानं घरातून हाकलून दिलं तरी वयोवृद्धांकडून जिव्हाळा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:43 AM

ज्येष्ठ नागरिक आणि पालन पोषण व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ हा नवा कायदा शासनाने केवळ वयोवृद्धांच्या हालअपेष्टा डोळ्यांसमोर ठेवून पारित केला आहे.

दत्ता यादव सातारा : बदलत्या जीवनशैलीत वृद्ध आई-वडील तरुण पिढीला आता नकोसे होऊ लागले आहेत. त्यामुळे असे अनेक वृद्ध लोक नाईलाजानं आश्रमात राहत आहेत, तर काही जण बेघर झाल्याचे पाहायला मिळते. या पाठीमागचे एकमेव कारण म्हणजे इभ्रतीचा विचार करून वृद्ध आई-वडील मुलांकडून होणारा छळ गपगुमान सहन करताहेत. हे विदारक चित्र निवारा केंद्र अन् पोलीस ठाण्यातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

अलीकडे वयोवृद्धांची केवळ कौटुंबिक कारणांमुळेच जास्त फरपट होते. मात्र, चार भिंतीआड सुरू असलेली घुसमट नेमकी कोणत्या मार्गाने बाहेर काढावी, हे अनेक वृद्धांना माहिती नसते. त्यामुळे काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तर काही जण कायमचे घर सोडण्यात धन्यता मानतात; परंतु ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, अशा लोकांना कुटुंबाची इभ्रत महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्या मुलाच्या विरोधात बंड करण्यास असे वृद्ध धजावत नाहीत. शरीर साथ देत नसल्याने आता आपलं आयुष्य संपलं, अशी धारणा वयोवृद्धांच्या मनात घर करते.

आयुष्यभर इमानेइतबारे काम करून समाजात प्रतिष्ठा मिळविलेली असते. अशा वेळी उतारवयात आधारवड ठरणाऱ्या मुलाकडूनच जेव्हा बापाला घरातून हाकलून दिले जाते, तेव्हा बापाच्या डोळ्यांसमोर केवळ मरण दिसते.आमच्या निवारा केंद्रामध्ये दाखल असलेल्या बºयाच वृद्धांना नातेवाईक आहेत. अनेकजण चौकशीसाठी येतात तर काहीजण आई-वडिलांना जबरदस्तीने निवारा केंद्रामध्ये पाठविण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून मन हेलावून जातंय. निवारा केंद्रात राहू; पण मुलाविरोधात तक्रार नको, अशी आईवडिलांची धारणा असते. - रवी बोडके, यशोधन निवारा केंद्र, वाईवयोवृद्धेचा समाजासाठी अनोखा संदेशकोरेगाव तालुक्यातील नागुबाई गुजरे (वय ७०) यांना एक मुलगा व दोन विवाहित मुली. त्यांच्या एकुलत्या एक मुलानं त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली. आईला त्यानं घरातून हाकलून दिलं. कोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित मुलावर आईची जबाबदारी नाकारल्यामुळे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पुरावे गोळा करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपही पत्र दाखल केले. नागुबाई गुजरे यांनी समाजासाठी अनोखा संदेश दिला आहे. ‘‘माझ्यासारख्या अनेक आई आणि बापांना घरातून हाकलून दिलं जातंय. त्यांचेच मी प्रतिनिधित्व केले असून, यातून एका तरी मुलाने धडा घेतला तरी मी माझ्या मुलाविरोधात तक्रार दिल्याचे मला समाधान लाभेल,’’ असे गुजरे यांनी तपासी अधिकाऱ्यांना सांगितलंय.

आई-वडील काय विचार करतात...

  • आपले नातेवाईक नावे ठेवतील
  • मुलाच्या विरोधात तक्रार दिली तर पुन्हा तो सांभाळेल का?
  • पोलीस तक्रार घेतील का?
  • समाजात नाचक्की होईल
  • उतारवयात परवड सोसणार नाही
  • पोलीस ठाणे, न्यायालयाचे खेटे घालणार कोण?

 

काय करायला हवं...

  • कायद्याची जनजागृती होणे गरजेचे
  • पोलीस ठाण्यात वृद्धांच्या समस्यांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याची गरज
  • वृद्धांसाठी काम करणाºया सामाजिक संस्थांना शासनाकडून पाठबळ मिळावे

ज्येष्ठ नागरिक आणि पालन पोषण व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ हा नवा कायदा शासनाने केवळ वयोवृद्धांच्या हालअपेष्टा डोळ्यांसमोर ठेवून पारित केला आहे.

या कायद्यानुसार एखादा मुलगा दोषी आढळला तर त्याला जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत कारावास आणिदंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. परंतु हा कायदा अनेक वृद्धांना माहितीही नाही.पोटच्या मुलाच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर साºया जगाला कळेल, अशीही आतून त्यांना हुरहूर असते. त्यामुळे आईवडिलांची वृद्धापकाळातील परवड समाजासमोर येत नाही.

उतारवयात आपली कोणी दखल घेणार नाही आणि घेतलीच तरी पोलीस ठाणे अन् न्यायालयात हेलपाटे मारणे थकलेल्या शरीराला शक्य होणार नाही, अशी धास्ती असल्यामुळे पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारींची संख्या अत्यंत नगण्य आहे. गेल्या दोन वर्षांत सातारा जिल्ह्यात केवळ सात जणांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.