शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापुरी दणक्याने रंगाची ती जाहिरात अखेर मागे, ऋतुराज पाटील यांनी दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:46 IST

एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरी दणक्याने रंगाची ती जाहिरात अखेर मागेआमदार ऋतुराज पाटील झाले होते आक्रमक

कोल्हापूर : एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.

कंपनीच्या या जाहिरातीत त्या घरातील चिंटूचे तीन मित्र त्याच्या घरी येतात व तुझे घर किती चमकत आहे! असे म्हणतात. लाईट लावल्यावर तर ते घर अधिकच उजळून निघते. त्यावर चिंटूचे मित्र त्यास तुझे घर इतके चांगेल आहे तर तुमच्याकडे पैसेही भरपूर असतील?अशी विचारणा करतात. त्यावर चिंटू होय, भरपूर पैसे असून आम्ही यंदा सिंगापूरला जाणार असल्याचे मोठ्या आविर्भावात मित्रांना सांगतो.

तेवढ्यात चिंटूचे वडील येतात व ते रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले असून आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगतात. त्यावर चिंटू प्रश्नार्थक नजरेने कोल्हापूर?... अशी विचारणा करतो. त्यावर त्याचे मित्र हसत-हसत कुचेष्टेने सिंगापूर असे सांगतात. त्यातून कोल्हापूरला हिणवल्याचे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे.

ही जाहिरात तातडीने मागे घेण्याची मागणी ऋतुराज पाटील यांनी कंपनीकडे ट्विटद्वारे केली होती. वृत्तवाहिन्यांनीही या जाहिरातीचे प्रसारण करू नये, असे आमदार पाटील यांनी म्हटले होते.कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे पूर्ण पीठ आहे. कोल्हापूर कला-साहित्य, क्रीडापासून ते शेती, सिंचन अशा अनेक क्षेत्रांत देशात नावाजलेले शहर आहे. त्यामुळे ते सिंगापूरइतकेच महत्त्वाचे असल्याने कोल्हापूरची कुणी चेष्टा करू नये, असे त्यांनी म्हटले होते. 

जाहिरातीविरोधात कोल्हापूरकरांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. शहरातील विविध ठिकाणी आज पेंटच्या जाहिराती विरोधात निदर्शने करण्यात आली. जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत कोल्हापुरात कंपनीचा एकही ट्रक येऊ देणार नाही, असा पवित्रा  घेतला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या पोस्टारला काळे फासत घोषणाबाजी केली तर, कसबा बावडा येथील युवकांनी 'पेंट' कंपनीच्या रंगांच्या बादल्या रस्त्यावर ओतून 'त्या' जाहिरातीचा निषेध केला. 

कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीने ही जाहिरात आता हटवली आहे.यु ट्यूबवरून हा व्हीडिओ या कंपनीने काढून टाकला आहे. एका दिवसात दहा हजार कोल्हापूरकरांनी हा व्हीडिओ डिस्लाईक केला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटील