शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

अन्नधान्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम!

By admin | Updated: September 20, 2015 22:50 IST

२0१५ आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषीत; जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर कृषीविद्यापीठांचा भर.

अकोला : जगातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे. त्यासाठी अन्नाविना कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परंतु जमिनीतील प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत असून, त्याचा परिणाम थेट शेतातील पीक उत्पादनावर होत असल्याने उत्पादन घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हा धोका लक्षात घेऊन २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. जमीन व मातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याने या वर्षात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक जण शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या मागे लागला आहे. आपण जमिनीचे शोषणच करत असल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतात पिके घेताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पिकानुसार सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा वापर करावा लागणार असून, पिकांची फेरपालट, हिरवळीचे खते इत्यादींचा शेतात नियमित वापर करावा लागणार आहे. या उपाययोजना केल्यास अन्नद्रव्याचा र्‍हास थांबवता येणार आहे. याकरिता मृद संधारणावरसुद्धा तेवढेच लक्ष द्यावे लागणार असून, लोकांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे अपरिहार्य झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जागतिक स्तरावर २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष घोषित करण्यात आले आहे. शेतकरी व समाजात शेतजमिनीबाबत साक्षरता घडवून आणण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र संस्थेने अन्न व सुरक्षा संस्था रोम यांच्यावर सोपविली आहे. मृदा वर्ष साजरे करण्यामागे अन्नधान्य सुरक्षित व पर्यावरणाचे महत्त्व आणि जमिनीचे महत्त्व लक्षात घेऊन सरकार व कृषी संस्थांनी जनजागृती करावी, हा उद्देश आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरी परिसंवाद, प्रशिक्षण, कृषी मेळावे, शेतकर्‍यांच्या भेटी, माती परीक्षणासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे, मातीच्या नमुन्याचे पृथ्थकरण करू न मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप इत्यादी कार्यक्रम हाती घेतले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत मातीच्या आरोग्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील अन्नधान्याची भूक भागवायची असेल, तर जमिनीचे आरोग्य सुदृढ ठेवावे लागणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने कार्यक्रम सुरू केले असल्याचे कृषी विद्यापीठाचे मृद व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी.बी. तामगाडगे यांनी स्पष्ट केले.