शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

अन्नधान्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम!

By admin | Updated: September 20, 2015 22:50 IST

२0१५ आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषीत; जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर कृषीविद्यापीठांचा भर.

अकोला : जगातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे. त्यासाठी अन्नाविना कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परंतु जमिनीतील प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत असून, त्याचा परिणाम थेट शेतातील पीक उत्पादनावर होत असल्याने उत्पादन घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हा धोका लक्षात घेऊन २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. जमीन व मातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याने या वर्षात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक जण शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या मागे लागला आहे. आपण जमिनीचे शोषणच करत असल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतात पिके घेताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पिकानुसार सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा वापर करावा लागणार असून, पिकांची फेरपालट, हिरवळीचे खते इत्यादींचा शेतात नियमित वापर करावा लागणार आहे. या उपाययोजना केल्यास अन्नद्रव्याचा र्‍हास थांबवता येणार आहे. याकरिता मृद संधारणावरसुद्धा तेवढेच लक्ष द्यावे लागणार असून, लोकांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे अपरिहार्य झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जागतिक स्तरावर २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष घोषित करण्यात आले आहे. शेतकरी व समाजात शेतजमिनीबाबत साक्षरता घडवून आणण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र संस्थेने अन्न व सुरक्षा संस्था रोम यांच्यावर सोपविली आहे. मृदा वर्ष साजरे करण्यामागे अन्नधान्य सुरक्षित व पर्यावरणाचे महत्त्व आणि जमिनीचे महत्त्व लक्षात घेऊन सरकार व कृषी संस्थांनी जनजागृती करावी, हा उद्देश आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरी परिसंवाद, प्रशिक्षण, कृषी मेळावे, शेतकर्‍यांच्या भेटी, माती परीक्षणासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे, मातीच्या नमुन्याचे पृथ्थकरण करू न मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप इत्यादी कार्यक्रम हाती घेतले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत मातीच्या आरोग्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील अन्नधान्याची भूक भागवायची असेल, तर जमिनीचे आरोग्य सुदृढ ठेवावे लागणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने कार्यक्रम सुरू केले असल्याचे कृषी विद्यापीठाचे मृद व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी.बी. तामगाडगे यांनी स्पष्ट केले.