शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

आदिवासी जमीन संपादन ग्रामसभेच्या मान्यतेविना, बुलेट ट्रेनसह समृद्धी मार्ग, पेसा कायद्यानुसार बंधनकारक अट रद्द  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:36 AM

आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना,

- नारायण जाधवठाणे : आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना, पेसा कायद्यानुसार बंधनकारक असलेली ग्रामसभेची अटच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह एमएमआरडीएचा विरार-अलिबाग कॉरिडॉर लवकरात लवकर पूर्ण करण्याची सबब दाखवून व्हायटल प्रोजेक्ट अर्थात निकडीचे जनहितकारी सरकारी प्रकल्पांच्या नावांखाली अशा प्रकल्पांना लागणारी आदिवासी जमीन संपादनासाठी पेसा कायद्यानुसार बंधनकारक असलेली ग्रामसभेची अटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जमीन महसूल कायदा १९६६च्या कलम ३६ एमध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. यामुळे आता अशा प्रकल्पांसाठी लागणारी आदिवासी जमीन शासन कोणत्याही प्रकारची जनसुनावणी अथवा ग्रामसभेचा ठराव मंजूर न करता त्यांना वाटेल तेव्हा व वाटेल तितकी संपादित करू शकणार आहे. याबाबतचा अध्यादेश गुपचूप १४ नोव्हेंबरला काढला आहे. यासाठी आदिवासींचे संरक्षण करणाºया पेसा कायद्याच्या तरतुदीत बदल करण्यात आला असून, तो थेट राज्यपालांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील १.१० लाख कोटींचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ५० हजार कोटींचा मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठीही मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीन लागणार आहे. शिवाय १२१ किमीचा विरार-अलिबाग कॉरिडोरही आदिवासी जमिनीतून जाणार आहे. परंतु, ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असल्याने हे तिन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणे कठीण होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून विधिमंडळात चर्चा न करता आणि आदिवासी सल्लागार मंडळाची मान्यता न घेताच थेट राज्यपालांच्या घटनात्मक अधिकाºयांचा फायदा घेऊन ग्रामसभेच्या मान्यतेची अटच काढून टाकण्याचा निर्णय विद्यमान युती सरकारने घेतल्याची चर्चा आहे.निर्णय आदिवासींवर अन्यायकारकमहाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आदिवासींवर अन्याय करणारा आहे. पेसा कायद्यानुसार आदिवासी खेड्यांचे अधिकार वाढवून त्यांना संरक्षण देण्यात आले होते. ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असल्याने आदिवासी जमीन सहजासहजी संपादित करता येत नव्हती. मात्र, आता ही अटच राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढून रद्द करण्यात आली आहे. यामुळे एकट्यादुकट्या आदिवासीला गाठून धाकदडपशाहीचा प्रयोग करून त्याची जमीन संपादित करणे शासनास सोपे होणार आहे. ही वस्तुस्थिती आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.निकडीच्या प्रकल्पांत यांचा समावेशकेंद्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्प, गॅस प्रकल्प, पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांसह अशा प्रकारच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या मालकीच्या तत्सम प्रकल्पांचा यात समावेश आहे.121 विरार-अलिबाग कॉरिडोरही आदिवासी जमिनीतून जाणार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई