शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आदित्य ठाकरे चालले बिहारला; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेणार भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:20 IST

राज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत.

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी २३ नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामागचं नियोजन सांगितलं नसलं तरी १ दिवसीय दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. 

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुकीची तयारीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे बुधवारी आदित्य ठाकरे एका दिवसासाठी बिहारला जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. बिहारच्या पटना येथे ते उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांना भेटतील. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व शिवसेना उपनेते खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे संघटनेत सक्रीयराज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत. बंडखोर शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी दौरे करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अभ्यासू शैलीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे राज्याबाहेर दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमताअलीकडेच भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यानंतर काही अंतर आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत सोबत केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय? अशी विचारणा करत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेTejashwi Yadavतेजस्वी यादवShiv Senaशिवसेना