शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भाजपातील सर्वोच्च व्यक्तीला भेटायला आदित्य ठाकरेंनी वेळ मागितलीय; शिवसेनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:55 IST

उद्धव ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी शरद पवारांकडून घेतली आणि त्यात ते यशस्वी झाले असं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. 

ठाणे - शिल्लक सेनेचे नेते संजय राऊत आणि इतर सर्वजण सरबरीत झालेले आहे. त्यामुळे ते काहीही आरोप करतायेत. भाजपानंशिवसेना संपवण्याची सुपारी घेतलीय आणि त्यांच्या स्क्रिप्टनुसार दिल्लीतून हा निर्णय आला असं भाष्य ते करतायेत. परंतु त्यांचेच आदित्य ठाकरेभाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी वेळ मागतायेत असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना तुम्ही जाऊन विचारा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरिता वेळ मागितली आहे. त्या नेत्याने अद्याप आदित्य ठाकरेंना भेटायला वेळ दिली नाही. यावरून हे किती दुतोंडी आहेत हे स्पष्ट होते. एकीकडे भाजपावर टीका करायची आणि दुसरीकडे नववर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने सर्वोच्च नेत्याला भेटायची वेळ मागायची असं दुतोंडी काम या लोकांचे सुरू आहे. इंडिया आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे भाजपासोबत जुळवण्याचा प्रयत्न करायचा ही दुतोंडी सापासारखी वर्तवणूक उबाठा गटाच्या नेत्यांची झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच श्रीकांत शिंदे हे स्वत:च्या कतृत्वावर, मेहनतीवर त्या मतदारसंघात काम करत आहेत. त्या मतदारसंघात केलेली कामे म्हणजे खासदार कसा असावा याचे तंतोतंत उदाहरण श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल त्यांच्या कामगिरीवर संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या कामावरती त्यांनी नाव बनवलं आहे. संजय राऊत यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत त्यामुळे ते काहीही बोलतायेत. शिवसेना संपवण्याची, उद्धव ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी शरद पवारांकडून घेतली आणि त्यात ते यशस्वी झाले असं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. 

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव

लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.  सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे