शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:56 IST

स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई - घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ऊठसूठ सर्वांना आश्वासने दिली. परंतु एकही काम झाले नाही. वेदांतासारखा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितले गेले. पण अजून काहीही झाले नाही. महाराष्ट्र सरकारने जे इकोनॉमी कौन्सिल बनवलं आहे त्याचे अध्यक्षच गुजरातला जाऊन ७० हजार कोटींची गुंतवणूक करतात. मग तुमच्या हातात काय राहिले?. गुजरातच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतला गेला नाही. स्वखर्चात परदेश दौरा करणाऱ्यांची नावे जाहीर करा. निर्लज्जपणा बाजूला ठेवा आणि महाराष्ट्राला जी काही उत्तरे द्यायला हवीत ती द्या अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ५० लोक सोबत होते. पण माझ्या टीकेनंतर ५-६ लोक कमी केले. त्यानंतर ४० जणांना दावोसला नेले. या दौऱ्याला २० कोटीहून अधिक खर्च दाखवू नका असं सांगितले. हा पैसा सामान्य लोकांच्या करातून जात आहे. जे उद्योगपती मुंबईत भेटायला हवे होते तेच दावोसला भेटले. दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी कामशून्य केले. मविआ सरकार असताना मी साधा मंत्री म्हणून दावोसला गेलो होतो. तेव्हा वर्ल्ड इकोनॉमी फोरमचं काँग्रेस सेंटर तिथे मला ३ ठिकाणी बोलायला संधी मिळाली. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये बोलल्याचे एकही फोटो नाही. ४० गुंडाची टोळी नेली. परंतु मित्र पक्षाच्या खात्यामधील कुणालाही नेले नाही असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मागील वर्षी जे करार केले त्याचे पुढे काहीच होत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचे होते. जेवढा खर्च मुख्यमंत्र्यांनी दावोसला केला तितका खर्च त्यांनी त्यांच्या गावात जिथं २ हेलिपॅड उभारले आहेत. तिथे या सर्वांना घेऊन आला तर महाराष्ट्राचा काही फायदा झाला असता. पण दुर्दैवाने एकाबाजूला व्हायब्रेंट गुजरात झाले. तिथे २६ लाख कोटी रुपयांचे MOU झाले. तामिळनाडू सरकारनेही हिंमत करून समिट घडवून आणले. तिथे सहा लाख कोटींची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात घेऊन गेले. पण महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र गेल्या २ वर्षापासून झाले नाही. स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, राजन साळवी, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्यामागे तपास यंत्रणा लागली आहे. तरीही हे नेते लढतायेत. काहीही झाले तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही ते आमच्यासोबत आहेत. लपवण्यासारखे ज्यांच्याकडे आहे ते भाजपा-शिंदे गटात जातात. सत्य बोलणाऱ्यांना नोटीस दिली जाते. ईडी, सीबीआयकडून आमच्या नेत्यांवर सातत्याने दबाव टाकला जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा