शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:56 IST

स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई - घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ऊठसूठ सर्वांना आश्वासने दिली. परंतु एकही काम झाले नाही. वेदांतासारखा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितले गेले. पण अजून काहीही झाले नाही. महाराष्ट्र सरकारने जे इकोनॉमी कौन्सिल बनवलं आहे त्याचे अध्यक्षच गुजरातला जाऊन ७० हजार कोटींची गुंतवणूक करतात. मग तुमच्या हातात काय राहिले?. गुजरातच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतला गेला नाही. स्वखर्चात परदेश दौरा करणाऱ्यांची नावे जाहीर करा. निर्लज्जपणा बाजूला ठेवा आणि महाराष्ट्राला जी काही उत्तरे द्यायला हवीत ती द्या अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ५० लोक सोबत होते. पण माझ्या टीकेनंतर ५-६ लोक कमी केले. त्यानंतर ४० जणांना दावोसला नेले. या दौऱ्याला २० कोटीहून अधिक खर्च दाखवू नका असं सांगितले. हा पैसा सामान्य लोकांच्या करातून जात आहे. जे उद्योगपती मुंबईत भेटायला हवे होते तेच दावोसला भेटले. दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी कामशून्य केले. मविआ सरकार असताना मी साधा मंत्री म्हणून दावोसला गेलो होतो. तेव्हा वर्ल्ड इकोनॉमी फोरमचं काँग्रेस सेंटर तिथे मला ३ ठिकाणी बोलायला संधी मिळाली. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये बोलल्याचे एकही फोटो नाही. ४० गुंडाची टोळी नेली. परंतु मित्र पक्षाच्या खात्यामधील कुणालाही नेले नाही असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मागील वर्षी जे करार केले त्याचे पुढे काहीच होत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचे होते. जेवढा खर्च मुख्यमंत्र्यांनी दावोसला केला तितका खर्च त्यांनी त्यांच्या गावात जिथं २ हेलिपॅड उभारले आहेत. तिथे या सर्वांना घेऊन आला तर महाराष्ट्राचा काही फायदा झाला असता. पण दुर्दैवाने एकाबाजूला व्हायब्रेंट गुजरात झाले. तिथे २६ लाख कोटी रुपयांचे MOU झाले. तामिळनाडू सरकारनेही हिंमत करून समिट घडवून आणले. तिथे सहा लाख कोटींची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात घेऊन गेले. पण महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र गेल्या २ वर्षापासून झाले नाही. स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, राजन साळवी, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्यामागे तपास यंत्रणा लागली आहे. तरीही हे नेते लढतायेत. काहीही झाले तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही ते आमच्यासोबत आहेत. लपवण्यासारखे ज्यांच्याकडे आहे ते भाजपा-शिंदे गटात जातात. सत्य बोलणाऱ्यांना नोटीस दिली जाते. ईडी, सीबीआयकडून आमच्या नेत्यांवर सातत्याने दबाव टाकला जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा