शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'ते' आमदार राजीनामा देणार का?; अमित शाहांच्या विधानावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:17 IST

या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला आहे त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

नागपूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून महायुती सरकारचा निषेध करण्यात येत आहे. डोक्यावर निळी टोपी आणि हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विरोधी आमदारांनी संविधान चौकापासून विधान भवनापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी अमित शाहांविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. अमित शाहांनी फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर देशातील जनतेचा आणि संविधानाचा अपमान केला आहे. रामदास आठवले, चंद्राबाबू आणि नितीश कुमार भाजपासोबत राहणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. अनेक आमदार स्वत:ला आंबेडकरवादी मानतात जे भाजपासोबत आहेत ते राजीनामा देणार आहेत का, त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली. 

त्याशिवाय या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला आहे त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. विधानाचा विपर्यास केला जातोय असं सांगतात, पण त्यांच्या भाषणात ते स्वत: बोलले होते. आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झालंय हे कोण बोलले, तुम्हीच बोलला मग विपर्यास कसा झाला? भाजपाची मानसिकता तीच आहे त्यामुळे ते माफी मागणार नाहीत. जर चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते. अनेकदा माणसांकडून चुका होतात, कुणीही चुकू शकते परंतु माफी मागतात, विनम्रता दाखवली जाते. भाजपाच्या मनात संविधानाबद्दल जो राग आहे तो त्यांच्या भाषणात दिसला असा आरोप आदित्य ठाकरेंनी भाजपावर केला.

दरम्यान, विरोधकांनी विपर्यास केला असं ते बोलत असतील तर त्यांच्यामागून कुणी आवाज काढत होते का, सभागृहात त्यांनीच विधान केले. ते चुकीचे बोललेत हे आम्ही सांगतोय. आता माफी मागितली तरी भाजपाची मानसिकता बदलणार आहे का? डॉ.बाबासाहेब यांचा अपमान भाजपातील आंबेडकरवादी आमदार सहन करणार आहेत का..? देशात सगळीकडे आंदोलन सुरू आहे. देशात या गोष्टीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAmit Shahअमित शाहDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा