शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:49 IST

एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, नेमके चित्र 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होईल. पण एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत. यासंदर्भात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार येण्यासंदर्भात विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सरकार १००% येईल. कारण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा ज्या-ज्या वर्गाला झाला आहे अथवा होणार आहे, तो वर्ग आमच्या बाजूने आहे. वीजबिल माफी मुळे शेतकरी आमच्या बाजूने आहेत, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहेत. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा, यामुळे जनता आमच्यासोबत आहे." एवढेच नाही तर, "केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८-५९ योजना सुरू आहेत. त्यामुळे, शहरी वर्गालाही वाटते की केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहिले, तर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल," असेही बावानकुळे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.  

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडवीस हेच असावेत? असा प्रश्न केला असता, "भाजपच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्केच वाटते की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. राष्ट्रवादीला वाटते की अजित दादा व्हावेत आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) वाटते की एकनाथ शिंदे व्हावेत. शेवटी निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या तिन्ही नेत्यांनी बसून करायचा असतो. तो होईल," असेही बावनकुळे म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे