शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

दंगल हा भाजपाचा निवडणूक ट्रेलर, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:47 AM

जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे.

श्रीगोंदा (अहमदनगर) : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे. निवडणुकीची चाहूल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोरेगाव भीमाची जातीय दंगल हा भाजपाने केलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी श्रीगोंदा फॅक्टरी येथे बोलताना केला.राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त शेतकरी मेळावा झाला. कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखाना प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतक ºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घालून शेतकºयांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी करण्यासाठी मोदी सरकारकडे पैसा कोठून येणार आहे. हा पैसा जनतेच्या खिशातून जाणार आहे. शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेसच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन श्रीगोंद्यासारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणात राहून सहकारी संस्था चालविण्याची गरज आहे.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नागवडेबापूंनी समाजाचे हित आणि कामातून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ते अनेक संस्थांवर काम करीत आहेत. हे त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. शिवाजीराव नागवडे म्हणाले, राजकारणाला अडचणीच्या काळात सुरूवात केली. तत्त्व आणि निष्ठेचे राजकारण करीत असताना अनेक अडचणी आल्या, पण जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे राजकारणातून समाजाचे हित साध्य करता आले, याचा आनंद आहे.