शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 08:58 IST

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाढदिवसाच्या दिवशीच ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर केली असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याची माहिती  नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती कोकाटे यांनी दिली. नव्या योजनेत शेतीक्षेत्रात दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात आजच अधिकृत शासकीय आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल....अशी असणार गुंतवणूकशेतीतील वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित कार्यन्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी चार हजार कोटी, जिल्हास्तरीय कृषी योजनांसाठी ५००, तर राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्प आधारित  योजनांसाठी ५०० कोटी अशी पाच हजार कोटींची गुंतवणूक कृषी समृद्धी योजनेसाठी असतील. 

काय आहे योजना’?कृषी समृद्धी योजना ही राज्यातील शेतीसंबंधी भांडवली गुंतवणुकीला चालना देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतीच्या एकूण उत्पादन प्रक्रियेला सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि शेतकऱ्यांना सुलभ व आधुनिक शेती व्यवस्थापनासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र