शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

दप्तराच्या ओझ्याबाबत ७७ टक्के पालक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:29 IST

शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजन दप्तर शाळेत घेऊन जावे लागत असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देदप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे समिती स्थापन आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीच्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच ८४.९ टक्के विद्यार्थी शाळेत उपलब्ध करून दिलेल्या पाण्याऐवजी घरातूनच पाणी बॉटल आणणे पसंत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजन दप्तर शाळेत घेऊन जावे लागत असल्याचे समोर आले आहे. दप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीने आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला. या अभ्यासपूर्ण अहवालाच्या आधारे देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून धोरण ठरविले जाणार आहे. त्यासाठी देशातील ३५२ शाळा, २ हजार ९९२ पालक, ३ हजार ६२४ विद्यार्थ्यांना या समितीतर्फे प्रश्नावली दिली होती. त्यातून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे बहुतांश शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अद्याप पाऊल उचलले नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवर १ ते ५ किलो वजनाचे दप्तर असल्याचे दिसून आले. दप्तरामध्ये ३.५ किलो वजनाची शालेय पुस्तके, २.५ किलो वजनाच्या वह्या, १ किलोचा जेवणाचा डबा, एक किलोची पाण्याची बॉटल असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणात ९१ टक्के विद्यार्थी वेळापत्रकानुसार वर्गात पुस्तके घेऊन जातात. वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी ७६.३ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना लॉकर उपलब्ध करून दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत वजनदार दप्तर आणू नये याबाबत सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले जाते......‘त्या’ गोष्टींचा अभ्यास करणार आमच्या पाल्यांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास होत असल्याचे ७७ टक्के पालकांनी समितीला कळविले आहे. विद्यार्थ्यांना शाळेकडून पुस्तकाचे दोन संच उपलब्ध करून दिल्यास दप्तराचे ओझे कमी होऊ शकते. मात्र, ८६.४ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे दोन संच दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे ७७ टक्के विद्यार्थी जेवणाचा डबा, ६३ टक्के विद्यार्थी पाण्याची बॉटल, ३.२ टक्के विद्यार्थी ‘स्पोर्ट किट’ व ०.६ टक्के विद्यार्थी शाळेत खेळणी घेऊन जात असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार कमी करण्यासाठी शाळेशी निगडित असलेल्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे, असे अहवालावरून दिसून येते.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी