शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

दप्तराच्या ओझ्याबाबत ७७ टक्के पालक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:29 IST

शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजन दप्तर शाळेत घेऊन जावे लागत असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देदप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे समिती स्थापन आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीच्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच ८४.९ टक्के विद्यार्थी शाळेत उपलब्ध करून दिलेल्या पाण्याऐवजी घरातूनच पाणी बॉटल आणणे पसंत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजन दप्तर शाळेत घेऊन जावे लागत असल्याचे समोर आले आहे. दप्तराच्या ओझ्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या समितीने आठवड्याभरापूर्वी आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला. या अभ्यासपूर्ण अहवालाच्या आधारे देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून धोरण ठरविले जाणार आहे. त्यासाठी देशातील ३५२ शाळा, २ हजार ९९२ पालक, ३ हजार ६२४ विद्यार्थ्यांना या समितीतर्फे प्रश्नावली दिली होती. त्यातून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे बहुतांश शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अद्याप पाऊल उचलले नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवर १ ते ५ किलो वजनाचे दप्तर असल्याचे दिसून आले. दप्तरामध्ये ३.५ किलो वजनाची शालेय पुस्तके, २.५ किलो वजनाच्या वह्या, १ किलोचा जेवणाचा डबा, एक किलोची पाण्याची बॉटल असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणात ९१ टक्के विद्यार्थी वेळापत्रकानुसार वर्गात पुस्तके घेऊन जातात. वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी ७६.३ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना लॉकर उपलब्ध करून दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत वजनदार दप्तर आणू नये याबाबत सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले जाते......‘त्या’ गोष्टींचा अभ्यास करणार आमच्या पाल्यांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास होत असल्याचे ७७ टक्के पालकांनी समितीला कळविले आहे. विद्यार्थ्यांना शाळेकडून पुस्तकाचे दोन संच उपलब्ध करून दिल्यास दप्तराचे ओझे कमी होऊ शकते. मात्र, ८६.४ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे दोन संच दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे ७७ टक्के विद्यार्थी जेवणाचा डबा, ६३ टक्के विद्यार्थी पाण्याची बॉटल, ३.२ टक्के विद्यार्थी ‘स्पोर्ट किट’ व ०.६ टक्के विद्यार्थी शाळेत खेळणी घेऊन जात असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार कमी करण्यासाठी शाळेशी निगडित असलेल्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे, असे अहवालावरून दिसून येते.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी