शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

CoronaVirus News : राज्यातील कोरोना लसीच्या वितरणाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 20:20 IST

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी, कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तसेच महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. 

 

दरम्यान, कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असणार आहे.

कोरोना लसीकरण प्रक्रियेत पारदर्शकता असेल - मोदीकोरोना लस सर्वात आधी कोणाला मिळणार, यावरही मोदींनी भाष्य केले. आघाडीवर राहून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिकता द्यायला हवी. कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता असेल, अशी ग्वाही मोदींनी दिली. कोरोना लस एकदा द्यावी लागेल की दोनदा, त्या लसीची किंमत किती असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे मोदी म्हणाले.याचबरोबर, कोरोना लसीच्या वितरणासाठी राज्यांसोबत मिळून काम सुरू आहे. लवकरच यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात येईल. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया बराच काळ चालेल. त्यासाठी आपल्याला एक टीम म्हणून काम करावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदर घटला आहे. त्यामुळे अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. कोरोनातून बरं होता येते, असा विचार करून खूप जण बेजबाबदारपणे वागत आहेत. अशी वर्तणूक आपल्याला परवडणारी नाही, असा धोक्याचा इशारा मोदींनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी