शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:59 IST

Aaditya Thackeray: महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यात कबुतरांना खायला टाकण्यास अधिकृतपणे बंदी घातली.

महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यात कबुतरांना खायला टाकण्यास अधिकृतपणे बंदी घातली. त्यानुसार, महापालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली. दरम्यान, शनिवारी महापालिकेचे कर्मचारी दादर येथील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे ही कारवाई लांबणीवर पडली असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

कबुतरखान्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दात निशाणा साधला. ते म्हणाले की, “कबुतरं म्हणजे शिंदे यांच्या आमदारांसारखी नाहीत की त्यांना कंट्रोल फीडिंग करावे लागेल. मुंबईचे पालकमंत्री असूनही त्यांनी महानगरपालिकेला कबुतरखाने बंद करण्यासाठी पत्र लिहिले, ही गोष्ट धक्कादायक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. स्थानिक नागरिकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो, असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मंत्री लोढा वरळी सी-फेसवर स्वतःचा बंगला बांधत आहेत, तिथे कबुतरांसाठी योग्य व्यवस्था करता येईल, अशा शब्दांत त्यांनी लोढांवरही टोला लगावला.

माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून सरकारला सवालन्यायालयाने माधुरी हत्तीणीला वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, आदित्य ठाकरेंनी माधुरी हत्तीणी ही महाराष्ट्रातच राहावी, अशी इच्छा व्यक्त केली. या संदर्भात आपण स्वतः वनतारा प्रशासनाशी संवाद साधला असून माधुरी हत्तीणीची योग्य देखभाल एखाद्या चांगल्या संस्थेकडून व्हावी, असे मत त्यांनी मांडले. तसेच, या निर्णयाविरोधात राज्य सरकार न्यायालयात कोणती भूमिका घेणार आहे? किंवा सरकार खरोखरच याविरोधात कोर्टात जाणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बीडीडी चाळीतील रहिवाशांचा गणेशोत्सव नवीन घरात साजरा व्हावाबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या चाव्या वाटपावरून सध्या सत्ताधारी पक्षामध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर बीडीडी चाळीतील रहिवाशांचा घराच्या चाव्या देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. येणारा गणेशोत्सव रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरातच साजरा करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे