शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

“उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत”; आदित्य ठाकरे भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:36 IST

Aaditya Thackeray: फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे सांगताना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

Aaditya Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी विदर्भाचा दौराही केला. शिवसेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे सातत्याने राज्यभर फिरून दौरे करत आहेत. यातच नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत

आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे भावनिक होत, एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटते. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. 

दरम्यान, या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावे लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोलले तरी गुन्हे दाखल होत आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNashikनाशिक