शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

“उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत”; आदित्य ठाकरे भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:36 IST

Aaditya Thackeray: फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे सांगताना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

Aaditya Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी विदर्भाचा दौराही केला. शिवसेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे सातत्याने राज्यभर फिरून दौरे करत आहेत. यातच नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत

आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे भावनिक होत, एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटते. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. 

दरम्यान, या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावे लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोलले तरी गुन्हे दाखल होत आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNashikनाशिक