शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे, महाराष्ट्र हाच धर्म मानून एकत्र यायला हवे”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 21:43 IST

Aaditya Thackeray News: राम मंदिर झाल्यावर रामराज्य यायला पाहिजे होते. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray News: २०२४ हे आपले वर्ष आहे. आपल्याला पुन्हा आपली सत्ता आणायची आहे . देशातील हे वातावरण भानायक होत चालले आहे . महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ज्या मंत्र्यांनी महिलांना टीव्हीवर शिव्या दिल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? वाद निर्माण करून ते जिंकतात. राज्यातील चित्र बदलायचे असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. 'प्राण जाय पर वचन ना जाये' हे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे आपल्याला गद्दारांना गाडून आपले सरकार आणावचे लागेल, असा निर्धार ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

एरंडोल येथील "महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र" मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अपेक्षित असा निकाल आहे. आमच्याबद्दल जो घोळ झाला तोच या ठिकाणी पण केला गेला आहे. अध्यक्ष हे काम करताना पक्षपात करत आहेत, हे धक्कादायक आहे . संविधानाचा अपमान त्यांनी केला आहे . पण पक्ष फोडूनही तुमचे ४०० पार होणार नाही . शरद पवार जिद्दीने लढत आहेत. शून्यातून त्यांनी निर्माण केले आहे. आता यांना महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. 

शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही

दिल्लीत कोणाला एवढे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? अन्न दात्याला! जणू काही ते दहशतवादी आहेत. एका सभेत ड्रोनमधून अश्रू धूर सोडले. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. राम मंदिर झाले. पहिले मंदिर फिर सरकार म्हटल होते. मंदिर झाल्यावर रामराज्य यायला पाहिजे होते. पण असे शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . सत्ताधाऱ्यांनी आपला महाराष्ट्र अस्थिर ठेवला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात नवे उद्योग येणार कसे? घरे पेटवून प्रगती होत नसते. भांडण लावून विकास होत नाही आणि समाजाला विखरून देश पुढे जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी तरुणांच्या मनातला आश्वासक महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र हाच धर्म मानून आपण एकत्र यायला हवे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना