शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

संजोग वाघेरे यांचा भाजपा प्रवेश होताच आदित्य ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सत्तेची चटक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:52 IST

Aaditya Thackeray News: निष्ठावंत म्हणून जे आपल्यासोबत राहिले, त्यांच्यासोबत जनता असतेच. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray News: भाजपने शनिवारी उद्धवसेना आणि शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांना प्रवेश देऊन दोघांना एकाचवेळी धक्का दिला. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुण्यातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी समर्थकांसह  भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेची चटक लागलेले पटापटा पळून गेले. मात्र, सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा जी जनता सत्ता देते, त्यांच्या सोबत राहणे महत्त्वाचे असते. त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. निष्ठावंत म्हणून जे आपल्या सोबत राहिले, त्यांच्या सोबत जनता असतेच. ज्यांना गुलाम बनायचे ते जातील, जाणाऱ्यांच्या विचार करू नका. पक्षाकडून ज्यांना जास्त पदे, प्रेम आशीर्वाद मिळाले, ते सोडून गेले. त्यांना आरशात स्वतःकडे बघताना काय वाटत असेल. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत

सरकारचे काम चांगले असते तर हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा आणून पैसे वाटायची गरज पडली नसती. जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत. गुलाम म्हणून सरकार सोबत राहिचे की जनतेसोबत राहिचे हे आता आपण ठरविले पाहिजे. पर्याय आपण दिला पाहिजे. बहुमताने सरकार आल्याचे म्हणतात, परंतु लोकांनी आमदार निवडून दिले की निवडणूक आयोगाने हा प्रश्न पडत आहे. सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रूपयांचे दिलेले आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, असे सांगत महायुती सरकारवर टीका केली. 

दरम्यान, शहरीकरण वाढत असून लोकसंख्या वाढत आहे. वाढणारे तरूण शांत बसणारे नाहीत. जगभरात आंदोलनासह मतदानातून बदल होत आहे. जनता स्वच्छ लोकांना निवडेल. ती स्वच्छ लोक आपल्याकडे आहेत. बदल घडवायला आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदल घडविण्यासाठी आत्मविश्वासाने उभे राहा. जनता तुमच्या पाठीशी उभी राहील, आशीर्वाद देईल. काही प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र, जिंकण्याचे गणित पाहूनच उमेदवार दिले जातील. त्यासाठी समजूतदारपणा दाखविण्याची आवश्यकता आहे. सगळेच चांगले असतात. मात्र, एकच उमेदवार निवडायचा असतो. मात्र, ज्याला उमेदवारी मिळेल, उमेदवार हा फक्त मशाल आहे हे पाहून सर्वांनी काम करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Aaditya Thackeray criticizes Sanjog Waghere's BJP entry, calls it power hunger.

Web Summary : Aaditya Thackeray criticized leaders defecting to BJP, labeling them power-hungry. He emphasized loyalty to the public, not the ruling party, and accused the government of misusing funds and failing on promises like farmer loan waivers.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील