शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:28 PM

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. भाजपा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना काही प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले आहे की, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

"आदित्य आणि रश्मी ठाकरे दिल्लीला गेले होते, असे मी माध्यमांकडून ऐकले. त्यांनी भेट घेतली (पंतप्रधान मोदी यांची), मात्र ही भेट कुठल्या कारणासाठी होती? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही. म्हणून ही भेट कशासाठी होती", असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी भेट घेतली का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ''ही भेट तर झाली आहे, हे वृत्तपत्रात छापून आलं आहे. यातच अशी जर भेट झाली असेल, तर कोणाच्याही मनात शंका येणं स्वाभाविक आहे.''

भाजपा पुन्हा ठाकरे यांना सोबत घेणार असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता दीपक केसरकर म्हणाले, ''मला स्वतःला असं वाटतं नाही. मात्र ते प्रयत्न करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शिवसैनिकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजेत. महायुती होणार होती. उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते. पण, त्यांनी शब्द फिरवला. दोनवेळा शब्द फिरवल्यानंतर त्यांना आता जवळ येऊ द्यायचे की नाही, हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनीच घ्यावा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपाShiv Senaशिवसेना