शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:21 IST

लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याचा भरवसा नाही असं विधान गडकरींनी केल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. काहीजण या योजनेविरोधात कोर्टातही गेलेत. महायुतीची ही योजना महिला मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतात. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. राज्य सरकार पैशांचा अपव्यय करतंय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

गडकरींच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मते विकत घेण्याची योजना आहे. लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले असे नाही. त्यासाठी इतर सर्व योजनांचे, प्रकल्पांचे पैसे या फक्त एका लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. या योजनेवरून सत्तेतल्या तिन्ही गटात मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा घेऊन त्यांना पत्र पाठवलं, त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. गडकरी म्हणतायेत ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जर अशाप्रकारे पैशाचा अपव्यय सुरू असेल. तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही. केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांचे काही कर्तव्य आहेत की नाही. देशाचं आर्थिक नियोजन करताना कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तरच हा देश पुढे जाईल. नितीन गडकरी हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडायला हवा असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चिंतेची बाब

नितीन गडकरींना आमच्या सर्वांपेक्षा नक्कीच आतमधली जास्त माहिती असणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी जे बोलतात. महाराष्ट्रातील जे नेते महायुतीसोबत होते राज ठाकरे हेदेखील तेच बोलले होते. सातत्याने अनेक चॅनेल आणि वर्तमानपत्रात जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अडचणीत असल्याचं सांगितले जाते. जर सरकारमधील लोक असे बोलत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने जयंत पाटील हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनातही जयंत पाटील सविस्तर बोललेत. महाराष्ट्राचं अर्थखाते अनेकवेळा आक्षेप घेते मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेटून निर्णय घेतले जातात. गेल्या ५ दशकापासून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली आहे. पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती उद्धभवली आहे त्याला महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूर येथील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. गडकरी म्हणाले की, सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. लाडकी बहीण योजना आली आहे. त्यामुळे अनुदानाचा पैसा तिथेही द्यावा लागतो असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारला टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा