शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:21 IST

लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याचा भरवसा नाही असं विधान गडकरींनी केल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. काहीजण या योजनेविरोधात कोर्टातही गेलेत. महायुतीची ही योजना महिला मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतात. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. राज्य सरकार पैशांचा अपव्यय करतंय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

गडकरींच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मते विकत घेण्याची योजना आहे. लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले असे नाही. त्यासाठी इतर सर्व योजनांचे, प्रकल्पांचे पैसे या फक्त एका लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. या योजनेवरून सत्तेतल्या तिन्ही गटात मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा घेऊन त्यांना पत्र पाठवलं, त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. गडकरी म्हणतायेत ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जर अशाप्रकारे पैशाचा अपव्यय सुरू असेल. तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही. केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांचे काही कर्तव्य आहेत की नाही. देशाचं आर्थिक नियोजन करताना कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तरच हा देश पुढे जाईल. नितीन गडकरी हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडायला हवा असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चिंतेची बाब

नितीन गडकरींना आमच्या सर्वांपेक्षा नक्कीच आतमधली जास्त माहिती असणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी जे बोलतात. महाराष्ट्रातील जे नेते महायुतीसोबत होते राज ठाकरे हेदेखील तेच बोलले होते. सातत्याने अनेक चॅनेल आणि वर्तमानपत्रात जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अडचणीत असल्याचं सांगितले जाते. जर सरकारमधील लोक असे बोलत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने जयंत पाटील हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनातही जयंत पाटील सविस्तर बोललेत. महाराष्ट्राचं अर्थखाते अनेकवेळा आक्षेप घेते मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेटून निर्णय घेतले जातात. गेल्या ५ दशकापासून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली आहे. पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती उद्धभवली आहे त्याला महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूर येथील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. गडकरी म्हणाले की, सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. लाडकी बहीण योजना आली आहे. त्यामुळे अनुदानाचा पैसा तिथेही द्यावा लागतो असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारला टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा