शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:27 IST

Devendra Fadnavis: देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाल्यानंतर वेगाने सुत्रं फिरून सर्वांची सुखरूप सुटका झाली.

नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. संपत आलेले खिशातील पैसे आणि पर्यटन कंपनीने हात वर करत नेपाळमध्येच अडकवून ठेवल्याने त्यांना सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. या भाविकांनी मदतीसाठी अनेकांना फोन लावले मात्र त्याचाही उपयोग होत नव्हता. यादरम्यान या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाली. त्यानंतर मात्र वेगाने सूत्रं फिरून हे भाविक नेपाळमधून सुखरूपपणे उत्तर प्रदेशात आणि तिथू महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आपल्या गावांमध्ये पोहोचले. या प्रसंगातून सुटका झाल्यानंतर भाविकांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांपैकी एक असलेल्या संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ जण नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. यामध्ये ३५ महिला आणि २३ पुरुषांचा समावेश होता. गोरखपूरहून नेपाळपर्यंत आम्ही व्यवस्थित पोहोचलो. तेथील लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना य़ेथील मंदिरांचं दर्शन घेतलं. मात्र, काठमांडूला आल्यावर आम्हाला राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं. आम्ही गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, तिथे आमची फसवणूक झाली. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, अशी धमकी या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी दिली. तसेच आम्हाला धमकावण्यास सुरूवात केली. परक्या देशात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. आम्ही ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी मी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर फडणवीस यांनी तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि  दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक  संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व  सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण अखेर सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसtourismपर्यटनNepalनेपाळIndiaभारत