शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:17 IST

अर्थसंकल्पाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. सध्या देशावर कोरोनाच्या आपत्तीचे संकट आहे. असे असताना शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.

जळगाव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोनाच्या आपत्तीतही शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा आहे. या अर्थसंकल्पात देशाचा चौफेर विकास साधण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. सध्या देशावर कोरोनाच्या आपत्तीचे संकट आहे. असे असताना शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकऱ्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे.

रासायनिक खतांनी मुक्त असणाऱ्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीसोबत अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, असेही महाजन म्हणाले.

महाजन म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBudgetअर्थसंकल्प 2022Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019BJPभाजपा