शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:52 IST

Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

मविआसोबत लढण्याची तयारी करता करता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिले आणि मविआची लढाई आणखी कठीण करून ठेवली. अशातच वंचितच्या काही उमेदवारांचे अर्ज रद्द झाले तर काहींनी माघारी घेतले आहेत. यात आता सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी दोन महत्वाची कारणे देत आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला आहे. 

सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

उमेदवारी जाहीर होताच मी गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्हात आलेलो आहे. इथे मी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. जनतेलाही भेटलो. गेल्या पंधरा दिवसांत मी खूप काही अनुभवले. आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. परंतु इथे मी जे काही अनुभवले ती चळवळ नव्हती, अशी टीका गायकवाड यांनी केली आहे. 

सोलापूरमधील भोळी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. त्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. परंतु चळवळीसाठीची जी फळी लागते तीच इथे पोकळ असल्याचे मला जाणवले आहे. ही फळी पोषक नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

येथील कार्यकारणीचा स्वार्थ आजही तसाच आहे. मता त्यांच्यात बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी लढण्यासाठी उतरलो होतो, परंतु ती फळी पाहून वाटतेय की मला हातात बंदूक देऊन मैदानात सोडलेय, पण त्या बंदुकीत गोळ्या नसून छर्रे आहेत. या छर्र्यांच्या मदतीने मी युद्ध लढवून जिंकेन असे वाटत नाही, असे राहुल गायकवाड म्हणाले. 

अशा अर्धवट अवस्थेत लढलो तर भाजप कार्यकर्त्यांना मदत करतोय असे वाटतेय. भाजपाच्या उमेदवाराला मदत करतोय अशी भीती आहे. त्यांचा एक नेता संसदेत जाईल आणि संविधानाला धोका निर्माण होईल, असे काही घडू नये म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असं वाटतंय. भाजपच्या उमेदवाराला सोईचं वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. संविधानाला धोका निर्माण होईल, असं माझ्याकडून काही होऊ नये असे मला वाटतं, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं.

टॅग्स :solapur-pcसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४