शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

सकाळी ९ वाजताची शाळा गैरसोईची; आम्ही आदेश पाळणार नाही, पालक अन् शाळा चालकांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:24 IST

वेळेचे नियोजन जुळत नसल्याने छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील पालक अन् शाळा चालकांचा निर्धार

राम शिनगारेछत्रपती संभाजीनगर : आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली असताना, अनेक पालकांमध्ये पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतची शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याच्या शासन निर्णयाची चिंता वाढली आहे. सकाळी लवकर शाळा असल्यास मुलांना तेथे सोडून नोकरीला जाता येई. आता मात्र वेळेचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील पालक, शाळा चालकांना पडला आहे. त्यामुळे आम्ही हा आदेश पाळणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’  अभियानाच्या उद्घाटनावेळी राज्यपालांनी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करावा, असे म्हटले होते. त्यावर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याचा निर्णय घेतला. अनेक कुटुंबांतील पती-पत्नी नोकरी करतात. नोकरीला जाण्यापूर्वी ते मुलांच्या शाळेची व्यवस्था करतात. मुलगा शाळेतून आल्यानंतरही त्यांच्या जेवणापासून इतर सर्व व्यवस्था केली असते. आता नव्या निर्णयामुळे मुलांना शाळेत सोडणे व नोकरीला जाण्याची वेळ एकच होऊ लागली आहे. त्याचा फटका प्रत्येकाला बसणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील शाळा चालकांसह पालकांनी पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्याविषयीचा पत्रव्यवहारही शालेय शिक्षण विभागाशी केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

शिक्षण विभागाने सकाळी ९ वाजल्यानंतर शाळा भरविण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची झोप होत नसल्याचे दिलेले कारणही तकलादू आहे. पालकांनीच विद्यार्थ्यांच्या झोपेची काळजी घेतली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत न जागता लवकरच झोपून लवकर उठणे, ही आपली पद्धत आहे. आम्ही पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. -प्रल्हाद शिंदे, संस्थापक, इंग्रजी शाळा महासंघ, छत्रपती संभाजीनगर

शासनाने घेतलेला निर्णय अतिशय गुंतागुंतीचा आहे. मुलांची झोप तर झालीच पाहिजे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, शाळांमधील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पालकांची नोकरी अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील पालक संघाने याबाबत निर्णय घेतला पाहिजे. पालक संघाला वेळा ठरविण्याचे अधिकार शासनाने द्यावेत. त्यातून सर्वच प्रश्न सुटतील. -डॉ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ व सरचिटणीस, स. भु. शिक्षण संस्था

भाऊ लवकर जाणार, बहीण उशिरा येणारछत्रपती संभाजीनगरमधील प्राथमिक ते माध्यमिकच्या बहुतांश शाळांच्या वेळा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ७ वाजल्यापासून बस घेऊन येतात. अनेक कुटुंबातील भाऊ सहावी, सातवी, आठवीला तर बहीण चौथीच्या खालील वर्गात आहे. बहीण-भाऊ एकाच बसमधून शाळेत जातात. नव्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास बहिणीला उशिरा शाळेत यावे लागेल. तेव्हा वाहतूक व्यवस्था कशी करणार, असा सवाल आहे.

टॅग्स :Schoolशाळा