शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये ९0 टक्के पाणीसाठा, पिकांची स्थितीही उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:54 IST

राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.

- योगेश बिडवईमुंबई : वरुणराजाने यंदा महाराष्ट्रावर मोठी कृपा केली असून आॅगस्टमध्ये राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसाने राज्यातील ४१ मोठ्या धरणांत सरासरी ८९ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे, असे जलसंपदा विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.मराठवाडा : जायकवाडी ८७%मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ८७% साठा झाला आहे. पूर्णा येलदरी धरण भरले आहे. माजलगाव (७३%), उर्ध्व पैनगंगा (९१%) धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मांजरा धरणात मात्र ३ टक्केच पाणीसाठा झाला आहे.विदर्भ : आठ धरणांमध्ये सरासरी ८५%विदर्भातही पाऊसमान चांगले आहे. विभागातील महत्त्वाच्या आठ धरणांमध्ये सरासरी ८५ टक्के साठा झाला आहे. पेंच तोतलाडोह धरण १00% भरले आहे. उर्ध्व वर्धा (९८%), इडियाडोह (९७%) धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. गोसीखुर्द धरणात ४९ टक्के साठा झाला आहे.पश्चिम महाराष्ट्र : सात धरणे १00%पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या सर्व १९ धरणांमध्ये जवळपास ९0 टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, खडसवासला, आंद्रा, नीरा देवघर, भाटघर आणि वीर ही धरणे १00 टक्के भरली आहेत. कोयना (९४%), वारणा (९५%) आणि भीमा-उजनी (९२%) ही धरणे लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत.उत्तर महाराष्ट्र : भंडारदरा १00 टक्केउत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मूळा धरण ९३ टक्के भरले आहे. भंडारदरा धरण १00 टक्के भरले आहे. दारणा (९३%), गंगापूर (९४%), गिरणा (७३%), हतनूर (४४%) धरणांमध्येही साठा वाढला आहे.राज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्गराज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील ८ धरणांचा समावेश आहे.मुंबई : तीन तलाव १00%मोडकसागर, विहार, तुळशी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. तानसा (९९%), बारवी (९५%) आणि मध्य वैतरणा (९५%) हे तलावही लवकरच भरतील, अशी स्थिती आहे.कोकण प्रदेश : पावसाचे धूमशानकोकणात यंदा पावसाचे धूमशान सुरू असून कोकण प्रदेशातील भातसा (९८%), सूर्या धामणी (१00%), वैतरणा (९४%) या प्रमुख तीन धरणांत ९0 टक्क्यांवर पाणीसाठी झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. 

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र