शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

९ हजार दुष्काळी गावांना शासकीय मदत नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:11 IST

भरपाईचा प्रस्तावही तयार नाही : राज्याच्या तिजोरीतून मदतीचे होते आश्वासन

यदु जोशीमुंबई : राज्यातील ९ हजार दुष्काळी गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या तिजोरीतून नुकसान भरपाई देण्याच्या घोषणेचा शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ १५ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही मदत व पुनर्वसन विभागाने या भरपाईचा साधा प्रस्तावही तयार केलेला नाही.

राज्य शासनाने १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांची भरपाईदेखील देण्यात आली. या १५१ तालुक्यांमधील सुमारे १९ लाख शेतकºयांना भरपाई मिळाली. केंद्र सरकारच्या निकषांनुसार आणि त्यांच्याच तिजोरीतून ही मदत देण्यात आली. त्याच सुमारास २६८ मंडळे त्यानंतर १३१ गावे आणि त्यानंतर ४५०० गावे अशा जवळपास ९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात एकूण २८ हजार दुष्काळी गावे आहेत. या गावांसाठी अन्य दुष्काळी गावांप्रमाणे आठ सवलतीदेखील लागू करण्यात आल्या.

या ९ हजार गावांमधील शेतकºयांना राज्याच्या तिजोरीतून भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत असून दुसºयाच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात या भरपाईची तरतूद करायची तर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय लवकरात लवकर होण्याची गरज आहे.

दिरंगाईबद्दल नाराजीमदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी अशा मदतीचा कुठलाही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही हे मान्य केले. ही बाब विचाराधीन आहे. या निर्णयामुळे किती अतिरिक्त भार राज्याचा तिजोरीवर येईल, याची माहिती मागविली जात आहे, असे सांगण्यात आले. भाजप-शिवसेनेच्या काही आमदारांनी ‘लोकमत’शी बोलताना या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार