शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:51 AM

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले.

मुंबई : रविवारी राज्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या ९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी तिघे जण मुंबईत,  पुणे व सोलापुरात प्रत्येकी दोघे, एक जण धुळ्यात तर एक जण बुलडाणा जिल्ह्यातील घटनेत बुडाला.

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले. याच दरम्यान पाच जण समुद्रात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम राजनलाल निर्मल (१८), संजय हिरामन तावडे (२०) या तरुणांंचे मृतदेह पथकाच्या हाती लागले. 

चारबंगला परिसरात राहणारे हिरामन तावड़े (५२) पूर्वी वर्सोवा गावात राहण्यास होते. नुकतेच ते चारबंगला परिसरात शिफ्ट झाले. ते वर्सोवा गावातच कामगार म्हणून काम करतात. ते भाऊ तावड़े म्हणून परिसरात ओळखीचे आहेत. रविवारी बाप्पाच्या विसर्जना दरम्यान बुडालेल्यामध्ये त्यांचा मुलगाही असल्याचे समजताच त्यांनीही समुद्रात उड़ी घेतली. 

ते बुडत असल्याचे लक्षात येताच राकेश सुकाचा आणि सुभाष शिपे  याांनी वाचवले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचा मुलगा संजय याचा मृतदेह मिळून आला आहे. तावड़े कुटुुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून राज्यात अन्य ठिकाणीही विसर्जनाच्यावेळी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनdrowningपाण्यात बुडणेGanesh Mahotsavगणेशोत्सव