शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

घरचे अर्थकारण बिघडल्याने ८२ टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 03:29 IST

शिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या रोजगाराविषयी विचारले असताना ३७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळेल, असे मत व्यक्त केले, तर १७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम केले. बऱ्याच क्षेत्रांचे स्वरूपही पालटले. याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या सर्वेक्षणादरम्यान राज्यातील उच्च शिक्षण घेणाºया ८२ टक्के विद्यार्थ्यांना कोरोनामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून २७ टक्के विद्यार्थी भविष्यात शिक्षण सुरू ठेवण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे समोर आले आहे.राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ समुपदेशक व संशोधक आनंद मापुस्कर व बी.एन. जगताप यांनी Impact of Covid-19 Pandemic on Higher Education in Maharashtra हे सर्वेक्षण केले आहे. याअंतर्गत राज्याच्या कानाकोपºयातील उच्च शिक्षण घेणाºया जवळपास ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुगल अर्जाच्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यातील माहितीची नोंद करण्यात आली असून आर्थिक परिणाम, आॅनलाइन शिक्षणपद्धती, शिक्षकांचे योगदान, मास्क /सॅनिटायझर, अंतिम शाखेच्या परीक्षा, रोजगारक्षमता अशा विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. अहवालात नोंदविलेल्या माहितीनुसार, ७३ टक्के विद्यार्थ्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.मागील दोन महिने शिक्षण क्षेत्र आॅनलाइन लर्निंग स्वरूपात सुरू आहे. याविषयी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले असता, ९१ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स तर ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप व संगणक उपलब्ध आहेत. सहा टक्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन शिक्षण नियमित ठेवण्यासाठी कोणतेही डिव्हाइस उपलब्ध नाही. केवळ ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शिक्षण पद्धत फायदेशीर असल्याचे मत मांडले. २६ टक्के विद्यार्थ्यांनी आॅफलाइन शिक्षण पद्धती आॅनलाइन पद्धतीला पर्याय असू शकत नाही, असे म्हटले आहे. ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीद्वारे शिक्षकांची मदत घेणे उपयुक्त असल्याचे, तर ४ टक्के विद्यार्थ्यांनी ही पद्धत आवडत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय चार टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शिक्षण घेत नसल्याचे म्हटले आहे.राज्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक वर्ष सहा महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तर ४२ टक्के विद्यार्थ्यांचा याविषयी काहीच निर्णय झाला नसल्याचे अहवालात नमूद आहे. प्रोजेक्ट्स व इंटर्नशिपविषयी विद्यार्थ्यांना विचारले असता, ३७ टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रोजेक्ट्स व इंटर्नशिपला पसंती दर्शविली असून २४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट, इंटर्नशिप पुढच्या सहामाहीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.४५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराची शाश्वती नाहीशिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या रोजगाराविषयी विचारले असताना ३७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळेल, असे मत व्यक्त केले, तर १७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे. ४५ टक्के विद्यार्थ्यांनी रोजगाराची कोणतीही शाश्वती नसल्याचे मत मांडले. याशिवाय ८२ टक्के विद्यार्थ्यांनी पदवीनंतरही रोजगाराच्या दृष्टिकोनातून कौशल्यविकास क्षेत्रात शिक्षणघेण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस