शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 14:48 IST

सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

सोलापूर: विडी उद्योगावर शासनाची अशीच वक्रदृष्टी राहिल्यास पुढील दहा-पंधरा वर्षात विडी उद्योग हमखास बंद पडेल, अशी भीती विडी उद्योजकांना लागून आहे. त्यादृष्टीने उद्योगाची अधोगती सुरु झाली आहे. मागील दहा वर्षांत सोलापूर सह राज्यातील अनेक विडी कंपन्या बंद पडल्या आहेत. भविष्यात आणखीन काही कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. हे असेच सुरू राहिल्यास विडी उद्योग संपुष्टात येईल आणि या उद्योगावर अवलंबून असलेले देशभरातील तब्बल ८० लाख विडी कामगार उघड्यावर पडतील आणि यांचे पुनर्वसन सरकार करणार का? असा सवाल विडी उत्पादक संघ तसेच कामगार संघटनांकडून वारंवार विचारला जात आहे.

देशभरात शेती आणि टेक्स्टाईल नंतर सर्वाधिक रोजगार विडी उद्योगातून मिळतो. विशेष म्हणजे हजारो कोटींचा महसूल देखील याच उद्योगातून जमा होतो. विडी उद्योगात प्रत्यक्षपणे तब्बल ८० लाखांहून अधिक कामगार काम करतात. यात ९० टक्के कामगार हे महिला आहेत. तसेच या उद्योगा संबंधित व्यवसायात तब्बल ६० लाखांहून अधिक शेतकरी, शेतमजूर तसेच इतर कामगार अवलंबून आहेत. जंगलातील तेंदुपत्ता तोड कामात तब्बल २३ लाख कामगार कार्यरत आहेत. तसेच तंबाखूची शेती करणाऱ्या व्यवसायात तब्बल ३५ लाख शेतकरी, शेतमजूर कार्यरत आहेत.

मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार तसेच इतर आदिवासी राज्यात तेंदूपत्ता आणि तंबाखूची उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या सर्व कामगारांना विडी उद्योजकांच्या माध्यमातून पेन्शन, विमा, बोनस तसेच पीएफ दिला जातो. इतर सामाजिक सुरक्षा देखील उद्योजकांच्या विशेष सेसमधून दिल्या जातात. विडी उद्योगावर अनेक जाचक अटी आहेत. या अटी शिथिल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे या उद्योगावर मोठे धर्मसंकट कोसळले आहे.

राज्यात दोन लाख कामगारांचे काय होणारराज्यातील दोन लाख विडी कामगार हे विडी उद्योगावर अवलंबून आहेत. दोन लाख कामगारांना रोज दोनवेळचे सुखाचे जेवण मिळत आहे. त्यांच्या कुटुंबाचा देखील यावर उदरनिर्वाह सुरु आहे. सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अशात कामगारांच्या कामात आणि कामगार कपात होऊ लागली आहे.त्यामुळे बहुतांश कामगार दुसऱ्या उद्योगात रोजगाराचा पर्याय शोधत आहेत. काही महिला गारमेंट उद्योगात रोजगार शोधत आहेत. देशांच्या तुलनेत महाराष्ट्रात विडी उद्योजकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे येथे विडी कारखाने बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील उद्योजकांच्या माहितीनुसार पुढील दहा पंधरा वर्षात राज्यातील सर्व विडी कारखाने बंद पडतील आणि दोन लाख कामगार बेरोजगार होतील, अशी चिंता येथील कारखानदार तसेच कामगारांना आहे.

पहिल्यापासून सरकार विडी उद्योगाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहत नाही. त्यामुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे. याबाबत आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.याचा काहीच उपयोग होईना. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत. आमच्यातील काही उद्योजक दुसऱ्या उद्योगाकडे वळले आहेत. आणखीन काही उद्योजक विडी उद्योग बंद करुन दुसरा पर्याय शोधत आहेत. मालकांचे पुनर्वसन होईल पण विडी कामगारांचे काय. भविष्यात लाखो विडी कामगार उघड्यावर पडतील. - बाळासाहेब जगदाळे ( प्रवक्ता, जिल्हा विडी उत्पादक संघ, सोलापूर)