शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 14:48 IST

सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

सोलापूर: विडी उद्योगावर शासनाची अशीच वक्रदृष्टी राहिल्यास पुढील दहा-पंधरा वर्षात विडी उद्योग हमखास बंद पडेल, अशी भीती विडी उद्योजकांना लागून आहे. त्यादृष्टीने उद्योगाची अधोगती सुरु झाली आहे. मागील दहा वर्षांत सोलापूर सह राज्यातील अनेक विडी कंपन्या बंद पडल्या आहेत. भविष्यात आणखीन काही कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. हे असेच सुरू राहिल्यास विडी उद्योग संपुष्टात येईल आणि या उद्योगावर अवलंबून असलेले देशभरातील तब्बल ८० लाख विडी कामगार उघड्यावर पडतील आणि यांचे पुनर्वसन सरकार करणार का? असा सवाल विडी उत्पादक संघ तसेच कामगार संघटनांकडून वारंवार विचारला जात आहे.

देशभरात शेती आणि टेक्स्टाईल नंतर सर्वाधिक रोजगार विडी उद्योगातून मिळतो. विशेष म्हणजे हजारो कोटींचा महसूल देखील याच उद्योगातून जमा होतो. विडी उद्योगात प्रत्यक्षपणे तब्बल ८० लाखांहून अधिक कामगार काम करतात. यात ९० टक्के कामगार हे महिला आहेत. तसेच या उद्योगा संबंधित व्यवसायात तब्बल ६० लाखांहून अधिक शेतकरी, शेतमजूर तसेच इतर कामगार अवलंबून आहेत. जंगलातील तेंदुपत्ता तोड कामात तब्बल २३ लाख कामगार कार्यरत आहेत. तसेच तंबाखूची शेती करणाऱ्या व्यवसायात तब्बल ३५ लाख शेतकरी, शेतमजूर कार्यरत आहेत.

मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार तसेच इतर आदिवासी राज्यात तेंदूपत्ता आणि तंबाखूची उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या सर्व कामगारांना विडी उद्योजकांच्या माध्यमातून पेन्शन, विमा, बोनस तसेच पीएफ दिला जातो. इतर सामाजिक सुरक्षा देखील उद्योजकांच्या विशेष सेसमधून दिल्या जातात. विडी उद्योगावर अनेक जाचक अटी आहेत. या अटी शिथिल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे या उद्योगावर मोठे धर्मसंकट कोसळले आहे.

राज्यात दोन लाख कामगारांचे काय होणारराज्यातील दोन लाख विडी कामगार हे विडी उद्योगावर अवलंबून आहेत. दोन लाख कामगारांना रोज दोनवेळचे सुखाचे जेवण मिळत आहे. त्यांच्या कुटुंबाचा देखील यावर उदरनिर्वाह सुरु आहे. सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अशात कामगारांच्या कामात आणि कामगार कपात होऊ लागली आहे.त्यामुळे बहुतांश कामगार दुसऱ्या उद्योगात रोजगाराचा पर्याय शोधत आहेत. काही महिला गारमेंट उद्योगात रोजगार शोधत आहेत. देशांच्या तुलनेत महाराष्ट्रात विडी उद्योजकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे येथे विडी कारखाने बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील उद्योजकांच्या माहितीनुसार पुढील दहा पंधरा वर्षात राज्यातील सर्व विडी कारखाने बंद पडतील आणि दोन लाख कामगार बेरोजगार होतील, अशी चिंता येथील कारखानदार तसेच कामगारांना आहे.

पहिल्यापासून सरकार विडी उद्योगाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहत नाही. त्यामुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे. याबाबत आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.याचा काहीच उपयोग होईना. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत. आमच्यातील काही उद्योजक दुसऱ्या उद्योगाकडे वळले आहेत. आणखीन काही उद्योजक विडी उद्योग बंद करुन दुसरा पर्याय शोधत आहेत. मालकांचे पुनर्वसन होईल पण विडी कामगारांचे काय. भविष्यात लाखो विडी कामगार उघड्यावर पडतील. - बाळासाहेब जगदाळे ( प्रवक्ता, जिल्हा विडी उत्पादक संघ, सोलापूर)