शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 07:45 IST

मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे.

 

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत अवघे एक हजार ७१७ रुग्णांचे निदान झाले असून, ५१ मृत्यूंची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत मंगळवारी बरे झालेल्या संख्या अधिक असून, तब्बल सहा हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात आतापर्यंत एकूण सहा लाख २३ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ४ ते १० मे या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३९ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ७९ हजार ९८६ असून, बळींचा आकडा १३ हजार ९४२ इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २८ हजार २५८ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६१ हजार ६८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

आतापर्यंत राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांना लसराज्यात सोमवारी २ लाख ९४ हजार ७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८४ लाख ७ हजार ४६५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.- राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक २७ लाख ८२ हजार ६४७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल, पुण्यात २४ लाख ८७ हजार ६४४, नागपूर ११ लाख १९ हजार ८१२ , ठाणे १४ लाख २३ हजार ४००, तर नाशिकमध्ये ८ लाख ३४ हजार ८१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात मागील २४ तासांत रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ४० हजार ९५६ रुग्ण आणि ७९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली असून बळींचा आकडा ७७ हजार १९१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र