शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक-उच्च प्राथमिकला पाचवी-आठवी जोडणार; शाळांच्या संरचनेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 12:38 IST

वर्ग जोडल्यानंतर शिक्षकांची अतिरिक्त पदे मंजूर पदांमधून भरावी लागणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांच्या संरचनेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार चौथीपर्यंतच्या वर्गाला पाचवीचा आणि सातवीपर्यंतच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडण्यात येणार आहे. ही नवी संरचना पहिली ते आठवी प्राथमिक-उच्च प्राथमिक व नववी ते दहावी माध्यमिक अशी आहे. नव्या संरचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे सरकारी शाळांना अतिरिक्तचे वर्ग जोडले जाणार आहेत.

राज्यात पहिली ते चौथीच्या ४१,९६६, पहिली ते सातवीच्या १७,७८८ सरकारी शाळा आहेत. त्यापैकी अनुक्रमे २८,५४९ शाळांना पाचवीचा आणि १२,१३१ शाळांना आठवीचा वर्ग अद्याप जोडण्यात आलेला नाही. नव्या आदेशाने या शाळांना अतिरिक्तचे वर्ग जोडले जातील.

गळती रोखणार

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मिळून सुमारे १९.२८ लाख विद्यार्थी आठवीत शिकत आहेत. तर नववीत केवळ १८.६३ लाख विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे सुमारे ४० हजार विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत प्रवेश घेतात. मात्र ४० हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांकडे खासगी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय वा शिक्षण सोडण्यावाचून पर्याय नसतो. वर्ग जोडल्याने ही गळती रोखता येईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

अतिरिक्त पदे समायोजनेतून भरा

वर्ग जोडल्यानंतर शिक्षकांची अतिरिक्त पदे मंजूर पदांमधून भरावी लागणार आहेत. सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या व त्या वर्गांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या शिक्षकांमधून ही पदे समायोजनेतून भरायची आहेत. थोडक्यात वर्ग वाढले तरी शिक्षकांची संख्या तीच राहणार आहे.

असा मिळवा निधी

वर्ग जोडणीमुळे भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारा निधी समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पीएमश्री शाळा, आदर्श शाळा, जिल्हा परिषद सेस फंड, जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणारा निधी, सीएसआर फंड, देवस्थानांचा निधी आदींच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी