शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५६ आरागिरण्या सील, वनविभागाची बघ्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:30 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित  करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली.

- गणेश वासनिक

अमरावती : प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित  करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली. औरंगाबाद येथे नियमबाह्य आरागिरण्या सील होऊ शकतात तर, अमरावतीत का नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.‘लोकमत’ने ‘चार हजार आरागिरणी परवान्यांचे नियमबाह्य नूतनीकरण’, ‘आरागिरण्यांचे फायर आॅडिट होणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वनविभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले व हा विषय लोकदरबारात मांडला. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. अमित झनक यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १०६६२८ अन्वये 'राज्यात चार हजार आरागिरण्यांचे नियमबाह्य नूतनीकरण' हा विषय थेट विधानसभेत नेला. शासनाने यासंदर्भात वनविभागाकडून सविस्तर माहिती मागविली असून, त्याकरिता संपूर्ण वनविभाग कामाला लागला आहे. मात्र, ‘लोकमत’ने उद्योग व कामगार विभागाचे आदेश गुंडाळून आरागिरण्या सुरू असल्याची बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने शासन आदेशाचे पालन करण्यासाठी पुढकार घेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरागिरण्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार किमान प्रदूषण प्रमाणपत्र तपासणीसाठी ‘पोल्युशन’ मंडळाने आरागिरणी मालकांना ८ डिसेंबर २०१७ रोजी नोटीशी बजावल्यात. तपासणीअंती १५ डिसेंबर २०१७ रोजी एकूण ५६ आरागिरण्यांना मोहोरबंद करण्यात आले. औरंगाबाद येथे नियमबाह्य आरागिरण्या सुरू असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचे धाडस दाखविले. परंतु, अमरावती जिल्ह्यात विना संमतीपत्र १३४ आरागिरण्या सुरू असताना वनविभाग किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर आरागिरण्यांना सील करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात आरागिरणी मालकांना वनविभागाकडून अभय मिळत असल्याने त्या राजरोसपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ मधील तरतुदीनुसार विना दाखला पीयूसी प्रमाणपत्र आरागिरणी चालविल्यास एक लाख रूपये दंडनीय शिक्षा आहे. परंतु, गत ३७ वर्षांपासून याबाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून राज्य शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला आहे. राज्यात चार हजार १०३ आरागिरण्या नोंदणीकृत असून आतापर्यत ५६ आरागिरण्यांना मोहोरबंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित तीन हजार ९७४ आरागिरण्यांना गत चार महिन्यांपासून सील न करता २०१८ यावर्षी आरागिरणी परवाने नूतनीकरणासाठी वनविभागाकडून सहकार्य केले जात आहे. राज्यात बहुतांश आरागिरण्या या विशिष्ट समुहाच्या असल्याने त्यांचे राजकीय लागेबांधे घट्ट आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यत आरागिरणी मालकांचे मधूर संबंध आहे, हे विशेष.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५३ महिन्यांनंतर लागू केले आदेशराष्ट्रीय हरित लवाद अर्ज क्रमांक ३७/२०१३ (वासनसिंग विरुद्ध पंजाब राज्य व इतर) प्रकरणी आरागिरण्यांमुळे हवेत प्रदूषण प्रमाण वाढत असल्याने हवा प्रदूषण नियंत्रण अधिनियम १९७४ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा दाखला (पीयूसी) घेण बंधनकारक आहे. हरीत लवादाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी ४ जुलै २०१३ रोजी अधिनस्थ सर्व राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळांना आरागिरणीसाठी जेथपर्यत पीयूसी प्रमाणपत्र जारी केले जात नाही, तोपर्यत त्या आरागिरण्या मोहोरबंद कराव्यात तसेच त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. औरंगाबाद येथे ५६ आरागिरण्या सील करून राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५३ महिने म्हणजे ८ डिसेंबर २०१७ रोजी लागू केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती