शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

शेतकऱ्यांसाठी ५२५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:39 IST

१६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या; महापूर व अवकाळीग्रस्तांना दिलासा

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५२५० कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे. महापूर व अवकाळीग्रस्त शेतकºयांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.क्यार व महाचक्रीवादळामुळे ३४ जिल्ह्यांच्या ३४९ तालुक्यांतील सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले. सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी संकटात भरडले गेले. राज्यपालांनी १६ नोव्हेंबर रोजी शेतकºयांसाठी मदत जाहीर केली. त्याचा पहिला हप्ता दिला. दुसºया टप्प्यात ४,५०० कोटी वितरित केले. पुरेशी तरतूद नसल्याने आकस्मिकता निधीतून दिलेल्या या रकमेची भरपाई करण्यासाठी पुरवणी मागण्यांमधून ४,५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. तेथील ज्या शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले नाही, पण पिकांचे ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत एसडीआरएफ व एनडीआरएफमधून द्यायच्या मदतीच्या तिप्पट दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३८९ कोटी रुपये वितरित केले. त्यासाठी अतिरिक्त ७५० कोटी रुपये पुरवणी मागणीतून दिले आहेत.अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर व भुकटी निर्यात यावरील अनुदानासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी ३९ कोटी, पंतप्रधान पीक विम्याच्या हप्त्यासाठी पाचशे कोटी, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ८९ कोटी रुपयांच्या मागण्यांचाही यात समावेश आहे.सार्वजनिक बांधकामच्या २,७८४ कोटींच्या मागण्या असून, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, बीओटी व मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठीच्या ५५० कोटींचा यात समावेश आहे. सोळा हजार कोटींच्या मागण्यांत ८,५१८ कोटी अनिवार्य खर्चासाठीचे आहेत. ६,८२७ कोटी विविध कार्यक्रमांच्या तरतुदीसाठी तर ७७५ कोटी केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठीचे आहेत.प्रमुख विभागांच्या पुरवणी मागण्या (कोटींमध्ये)उद्योग : १,०२३ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग : ९८६ । कृषी व पदुम : ९२९जलसंपदा : ८२७ । नगरविकास : ९६ । महिला आणि बालकल्याण : ६४८सामाजिक न्याय : ५४० । आरोग्य : ५०१ । गृह विभाग : ३५८

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार