शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेतकऱ्यांसाठी ५२५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:39 IST

१६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या; महापूर व अवकाळीग्रस्तांना दिलासा

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५२५० कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे. महापूर व अवकाळीग्रस्त शेतकºयांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.क्यार व महाचक्रीवादळामुळे ३४ जिल्ह्यांच्या ३४९ तालुक्यांतील सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले. सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी संकटात भरडले गेले. राज्यपालांनी १६ नोव्हेंबर रोजी शेतकºयांसाठी मदत जाहीर केली. त्याचा पहिला हप्ता दिला. दुसºया टप्प्यात ४,५०० कोटी वितरित केले. पुरेशी तरतूद नसल्याने आकस्मिकता निधीतून दिलेल्या या रकमेची भरपाई करण्यासाठी पुरवणी मागण्यांमधून ४,५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. तेथील ज्या शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले नाही, पण पिकांचे ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत एसडीआरएफ व एनडीआरएफमधून द्यायच्या मदतीच्या तिप्पट दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३८९ कोटी रुपये वितरित केले. त्यासाठी अतिरिक्त ७५० कोटी रुपये पुरवणी मागणीतून दिले आहेत.अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर व भुकटी निर्यात यावरील अनुदानासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी ३९ कोटी, पंतप्रधान पीक विम्याच्या हप्त्यासाठी पाचशे कोटी, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ८९ कोटी रुपयांच्या मागण्यांचाही यात समावेश आहे.सार्वजनिक बांधकामच्या २,७८४ कोटींच्या मागण्या असून, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, बीओटी व मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठीच्या ५५० कोटींचा यात समावेश आहे. सोळा हजार कोटींच्या मागण्यांत ८,५१८ कोटी अनिवार्य खर्चासाठीचे आहेत. ६,८२७ कोटी विविध कार्यक्रमांच्या तरतुदीसाठी तर ७७५ कोटी केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठीचे आहेत.प्रमुख विभागांच्या पुरवणी मागण्या (कोटींमध्ये)उद्योग : १,०२३ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग : ९८६ । कृषी व पदुम : ९२९जलसंपदा : ८२७ । नगरविकास : ९६ । महिला आणि बालकल्याण : ६४८सामाजिक न्याय : ५४० । आरोग्य : ५०१ । गृह विभाग : ३५८

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार