शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यात दस्त नोंदणी ५० हजार कोटींची, मार्चमध्ये साडेसात हजार कोटी झाले जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 07:40 IST

Maharashtra News: जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे.

 पुणे - जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. गेल्या ११ महिन्यांत दस्त नोंदणीतून ४२ हजार ३५८ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला होता, तर एकट्या मार्च महिन्यात दस्त नोंदणीतून ८ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिली.

राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी विभागाला ४५ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर, घर खरेदीला मिळणारा प्रतिसाद बघता वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उद्दिष्ट ५० हजार कोटी रुपयांचे केले. 

त्यानुसार, एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांमध्ये राज्यात २५ लाख २४ हजार २६८ दस्त नोंदणीतून ४२ हजार ३५८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. एकूण उद्दिष्टाच्या हे प्रमाण ८४.७२ टक्के इतके होते. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी मार्च महिन्यात विभागाला सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा महसूल येणे अपेक्षित होता. विभागाने हे ८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्टही ३१ मार्च अखेर साध्य केले आहे. ३१ मार्च रोजी २५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.

महिना     महसूल (कोटींत)एप्रिल     २८७५.८० मे     ३४३९.६२ जून     ३८०४.६९ जुलै     ३९२१.६३ ऑगस्ट     ४०५६.४६ सप्टेंबर     ४३७६.९६ ऑक्टोबर     ३७९७.६१ नोव्हेंबर     ३७३१.७८ डिसेंबर     ३९८२.२२ जानेवारी     ४१५६.४७ फेब्रुवारी     ४२१५.१८ मार्च (सुमारे)     ७६४२ एकूण (सुमारे)     ५०,०००  

टॅग्स :MONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार