शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:19 IST

राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यातील पाणीसाठा हा ४७.७० टक्के होता. यंदा तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४१ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१६-१७ मध्ये सिंचनाखालील शेतजमिनीचे क्षेत्र ४० लाख हेक्टर इतके होते.मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार करता, आतापर्यंत सर्वाधिक धरणे ही कोकण विभागात (८६.५६ टक्के) तर सर्वात कमी धरणे ही नागपूर विभागात (१७.४४ टक्के) आणि अमरावती विभागात २०.६८ टक्के तर मराठवाड्यात २६.७७ टक्के इतकी भरली आहेत. नाशिक विभागातील मोठी धरणे ६३.४६ टक्के भरली आहेत.मध्यम प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती विभाग २७.५६, नागपूर २२.६०, कोकण ८६.८८, नाशिक ३२.०७, पुणे ५५.०७, मराठवाडा १७.९०.लघु प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती १८.१९, नागपूर २६.०८, कोकण ७७.५२, नाशिक ३२.३८, पुणे १७.५८ आणि मराठवाडा १२.९८. राज्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांत ३८.३६ तर लघु प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाराज्यात सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ आणि मराठवाड्यात झाली असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.मुंबईचे पाणी टेन्शन मिटणारपावसाने गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र तलाव क्षेत्रांत अधूनमधून वरुण राजाची हजेरी असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभराचा जलसाठा जमा होण्यासाठी केवळ अडीच हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.या वर्षी पावसाने जुलै महिना गाजवला. जोरदार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली, मात्र तलावांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावामध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा दरवर्षी असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये ८३ टक्के म्हणजे १२ लाख ३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.१५तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५७विहार ८०.१२ ७३.९२ ८०.१६तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१६अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.२९भातसा १४२.०७ १०४.९० १३५.८५मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.४२

टॅग्स :DamधरणWaterपाणी