शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:19 IST

राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यातील पाणीसाठा हा ४७.७० टक्के होता. यंदा तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४१ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१६-१७ मध्ये सिंचनाखालील शेतजमिनीचे क्षेत्र ४० लाख हेक्टर इतके होते.मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार करता, आतापर्यंत सर्वाधिक धरणे ही कोकण विभागात (८६.५६ टक्के) तर सर्वात कमी धरणे ही नागपूर विभागात (१७.४४ टक्के) आणि अमरावती विभागात २०.६८ टक्के तर मराठवाड्यात २६.७७ टक्के इतकी भरली आहेत. नाशिक विभागातील मोठी धरणे ६३.४६ टक्के भरली आहेत.मध्यम प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती विभाग २७.५६, नागपूर २२.६०, कोकण ८६.८८, नाशिक ३२.०७, पुणे ५५.०७, मराठवाडा १७.९०.लघु प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती १८.१९, नागपूर २६.०८, कोकण ७७.५२, नाशिक ३२.३८, पुणे १७.५८ आणि मराठवाडा १२.९८. राज्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांत ३८.३६ तर लघु प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाराज्यात सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ आणि मराठवाड्यात झाली असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.मुंबईचे पाणी टेन्शन मिटणारपावसाने गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र तलाव क्षेत्रांत अधूनमधून वरुण राजाची हजेरी असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभराचा जलसाठा जमा होण्यासाठी केवळ अडीच हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.या वर्षी पावसाने जुलै महिना गाजवला. जोरदार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली, मात्र तलावांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावामध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा दरवर्षी असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये ८३ टक्के म्हणजे १२ लाख ३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.१५तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५७विहार ८०.१२ ७३.९२ ८०.१६तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१६अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.२९भातसा १४२.०७ १०४.९० १३५.८५मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.४२

टॅग्स :DamधरणWaterपाणी