शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:19 IST

राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यातील पाणीसाठा हा ४७.७० टक्के होता. यंदा तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४१ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१६-१७ मध्ये सिंचनाखालील शेतजमिनीचे क्षेत्र ४० लाख हेक्टर इतके होते.मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार करता, आतापर्यंत सर्वाधिक धरणे ही कोकण विभागात (८६.५६ टक्के) तर सर्वात कमी धरणे ही नागपूर विभागात (१७.४४ टक्के) आणि अमरावती विभागात २०.६८ टक्के तर मराठवाड्यात २६.७७ टक्के इतकी भरली आहेत. नाशिक विभागातील मोठी धरणे ६३.४६ टक्के भरली आहेत.मध्यम प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती विभाग २७.५६, नागपूर २२.६०, कोकण ८६.८८, नाशिक ३२.०७, पुणे ५५.०७, मराठवाडा १७.९०.लघु प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती १८.१९, नागपूर २६.०८, कोकण ७७.५२, नाशिक ३२.३८, पुणे १७.५८ आणि मराठवाडा १२.९८. राज्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांत ३८.३६ तर लघु प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाराज्यात सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ आणि मराठवाड्यात झाली असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.मुंबईचे पाणी टेन्शन मिटणारपावसाने गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र तलाव क्षेत्रांत अधूनमधून वरुण राजाची हजेरी असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभराचा जलसाठा जमा होण्यासाठी केवळ अडीच हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.या वर्षी पावसाने जुलै महिना गाजवला. जोरदार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली, मात्र तलावांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावामध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा दरवर्षी असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये ८३ टक्के म्हणजे १२ लाख ३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.१५तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५७विहार ८०.१२ ७३.९२ ८०.१६तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१६अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.२९भातसा १४२.०७ १०४.९० १३५.८५मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.४२

टॅग्स :DamधरणWaterपाणी