शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रातील 49 टक्के महिला म्हणतात पतीने मारहाण केल्यास काही गैर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 14:50 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 मधून घरगुती हिंसाचारासंबंधी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे ज्यांना पतीने पत्नीला मारहाण करणं चुकीचं वाटत नाही. सर्व्हेक्षणात सहभागी जवळपास 49 टक्के महिलांनी मारहाणीत काहीही गैर नसल्याचं सांगितलं आहे.

ठाणे - राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 मधून घरगुती हिंसाचारासंबंधी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे ज्यांना पतीने पत्नीला मारहाण करणं चुकीचं वाटत नाही. सर्व्हेक्षणात सहभागी जवळपास 49 टक्के महिलांनी मारहाणीत काहीही गैर नसल्याचं सांगितलं आहे. या महिलांचं म्हणणं आहे की, जर पत्नीने पतीचं ऐकलं नाही तर मारहाण होणं साहजिक आहे. सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या या महिलांनी सांगितलं आहे की, 'जर पती घरातील कामं न केल्यामुळे, मुलांवर व्यवस्थित लक्ष ने ठेवल्यामुळे किंवा शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करत असेल तर त्यात काही चुकीचं नाही'. 

सर्व्हेक्षणात सहभागी एकूण 3672 महिलांपैकी जवळपास 75 टक्के महिलांनी दारु प्यायल्यानंतर पती रागाच्या भरात हात उचलत असल्याची माहिती दिली आहे. फक्त 16 महिलांनी आपला पती फक्त चहा पित असल्याचं सांगितलं आहे, पण तरीही ते मारहाण करतात. जवळपास 20 टक्के महिलांनी आपला पती कानाखाली मारत असल्याची माहिती दिली आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे पती आणि सासरच्यांकडून मानसिक, भावनिक आणि शारिरीक छळ होत असतानाही फक्त नऊ टक्के महिला मदत मागतात. हा सर्व्हे महाराष्ट्रातील 15 ते 49 वर्ष वयोगटातील एकूण 4658 महिला आणि 4497 पुरुषांसोबत करण्यात आला आहे. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सांगितलं आहे की, 'मला अनेदा घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी मिळतात, पण परंपरा आणि कुटुंबासमोर त्या झुकतात. अनेक महिला आपल्या पतीविरोधात जाण्याची हिंमत दाखवत नाहीत. महिलांनी आपल्या अधिकारासाठी लढलं  पाहिजे. समाजाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्यासाठी काय योग्य आहे याचा विचार केला पाहिजे'.

मानसोपचारतज्ञ डॉ अदिती आचार्य यांनी म्हटलं आहे की, 'अनेक महिला आपल्या पतीवर अवलंबून असल्या कारणाने विरोधात जाण्याचं पाऊल उचलत नाहीत. इतकंच नाही तर सासरच्या बाजूला जाताच महिलांचा दृष्टीकोन बदलतो. स्वत: घरगुती हिंसाचार पीडित असतानाही अनेकदा आपल्या मुलाकडून सुनेला मारहाण होत असताना त्या विरोध करत नाहीत'.