शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

राज्यातील ४३ कारखान्यांची धुराडी बंद , १५० दीडशे कारखाने सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 19:41 IST

यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुभार्वामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता.

ठळक मुद्देसाखर उत्पादन गेले ९५ लाख टनांवरमंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल 

पुणे : राज्यातील १९३ पैकी ४३ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, ८५७.३३ लाख टन ऊस गाळपातून ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा देखील ११.१० टक्के इतका मिळाला आहे. राज्य,यंदाही साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार करेल अशी स्थिती आहे. गेल्या हंगामात देशात साखरेचे ३२० लाख टन उत्पादन झाले होते. त्यात राज्याचा वाटा १०७ लाख टनांचा होता. यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता. मात्र, अजूनही राज्यातील दीडशे कारखाने सुरु आहेत. त्यातही पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांमधील गाळप सुरु असल्याने यंदा देखील साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार होईल अशी स्थिती आहे. कोल्हापूर विभागातील २६ सहकारी आणि १२ खासगी कारखान्यांमधे १९७.१६ लाख टन ऊस गाळपातून २४ लाख टन साखर उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १२.२४ टक्के मिळाला. पुणे विभागातील ३१ कारखान्यांतून १८० लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, साखर उतारा ११.४२ टक्के मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील ४३ कारखान्यांनी १९६.१४ लाख टन ऊस गाळपातून १९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून, साखर उतारा १०.१७ टक्के आहे. अहमदनगर येथील २८ साखर कारखान्यांमध्ये १२८.०५ लाख टन ऊस गाळपातून १३.९० लाख टन साखर उत्पादन झाले असून, १०.८९ टक्के साखर उतारा मिळाला. औरंगाबाद येथील २४ कारखान्यांतून ७८.६९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाख टन आणि नांदेड येथील २३ कारखान्यांमधून ६८.७४ लाख टन ऊस गाळपातून सात लाख टन साखर उत्पादन झाले. औरंगाबादचा साखर उतारा १०.३७ आणि नांदेडचा ११.०५ टक्के इतका आहे. अमरावती विभागात ३.१३ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखरेचे उत्पादन झाले असून, नागपूरात ५.१२ लाख टन ऊस गाळपातून ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. येथील साखर उतारा अनुक्रमे १०.३२ आणि ९.८९ टक्के इतका आहे.  --------------मंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मंडलिक कारखान्याचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक १२.८५ टक्के (म्हणजे १०० किलोला १२.८५ किलो साखर) इतका आहे. या कारखान्याने पाच मार्च अखेरीस ४ लाख ५३ हजार ९१० टन ऊस गाळपातून, ५ लाख ८३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. खालोखाल साताºयाच्या जयवंत शुगरने १२.८३ इतका साखर उतारा मिळविला आहे. येथे ५ लाख २० हजार ७० टन ऊस गाळपातून ६ लाख ६७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित झाली. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखान्याला ११.९५ टक्के साखर उतारा मिळाला. येथे ७ लाख ७९ हजार ३२० टन ऊस गाळपातून, ९ लाख ३१ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

हंंगाम संपलेल्या कारखान्यांची संख्या कोल्हापूर  १२, पुणे ६, सोलापूर ११, अहमदनगर ७, औरंगाबाद २, नांदेड ३, अमरावती २

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी