शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

राज्यातील ४३ कारखान्यांची धुराडी बंद , १५० दीडशे कारखाने सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 19:41 IST

यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुभार्वामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता.

ठळक मुद्देसाखर उत्पादन गेले ९५ लाख टनांवरमंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल 

पुणे : राज्यातील १९३ पैकी ४३ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, ८५७.३३ लाख टन ऊस गाळपातून ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा देखील ११.१० टक्के इतका मिळाला आहे. राज्य,यंदाही साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार करेल अशी स्थिती आहे. गेल्या हंगामात देशात साखरेचे ३२० लाख टन उत्पादन झाले होते. त्यात राज्याचा वाटा १०७ लाख टनांचा होता. यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता. मात्र, अजूनही राज्यातील दीडशे कारखाने सुरु आहेत. त्यातही पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांमधील गाळप सुरु असल्याने यंदा देखील साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार होईल अशी स्थिती आहे. कोल्हापूर विभागातील २६ सहकारी आणि १२ खासगी कारखान्यांमधे १९७.१६ लाख टन ऊस गाळपातून २४ लाख टन साखर उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १२.२४ टक्के मिळाला. पुणे विभागातील ३१ कारखान्यांतून १८० लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, साखर उतारा ११.४२ टक्के मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील ४३ कारखान्यांनी १९६.१४ लाख टन ऊस गाळपातून १९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून, साखर उतारा १०.१७ टक्के आहे. अहमदनगर येथील २८ साखर कारखान्यांमध्ये १२८.०५ लाख टन ऊस गाळपातून १३.९० लाख टन साखर उत्पादन झाले असून, १०.८९ टक्के साखर उतारा मिळाला. औरंगाबाद येथील २४ कारखान्यांतून ७८.६९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाख टन आणि नांदेड येथील २३ कारखान्यांमधून ६८.७४ लाख टन ऊस गाळपातून सात लाख टन साखर उत्पादन झाले. औरंगाबादचा साखर उतारा १०.३७ आणि नांदेडचा ११.०५ टक्के इतका आहे. अमरावती विभागात ३.१३ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखरेचे उत्पादन झाले असून, नागपूरात ५.१२ लाख टन ऊस गाळपातून ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. येथील साखर उतारा अनुक्रमे १०.३२ आणि ९.८९ टक्के इतका आहे.  --------------मंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मंडलिक कारखान्याचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक १२.८५ टक्के (म्हणजे १०० किलोला १२.८५ किलो साखर) इतका आहे. या कारखान्याने पाच मार्च अखेरीस ४ लाख ५३ हजार ९१० टन ऊस गाळपातून, ५ लाख ८३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. खालोखाल साताºयाच्या जयवंत शुगरने १२.८३ इतका साखर उतारा मिळविला आहे. येथे ५ लाख २० हजार ७० टन ऊस गाळपातून ६ लाख ६७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित झाली. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखान्याला ११.९५ टक्के साखर उतारा मिळाला. येथे ७ लाख ७९ हजार ३२० टन ऊस गाळपातून, ९ लाख ३१ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

हंंगाम संपलेल्या कारखान्यांची संख्या कोल्हापूर  १२, पुणे ६, सोलापूर ११, अहमदनगर ७, औरंगाबाद २, नांदेड ३, अमरावती २

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी