शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:00 IST

राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत.

मुंबई : राज्यातील २८ जिल्ह्यांतील जलजीवन मिशन योजनेतील ४२०.७८ कोटी रुपये शासनाने २८ ऑगस्ट रोजी रात्री अचानक परत घेतले. हा निधी जलजीवन प्राधिकरणाकडे वळविला आहे. एका दिवसात घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची आर्थिक कोंडी झाली आहे.राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत. हा निधी काढून घेताना जिल्हा परिषदांना विचारण्यात आले नाही, तसेच हा निधी विहित कालावधीत खर्च करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या नव्हत्या, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

किती निधी गेला परत  बीडचे सर्वाधिक ६३.०४ कोटी, छत्रपती संभाजीनगर ७.३३ कोटी, जालना १.४७, लातूर १३.९३, हिंगोली १३.१९, अहमदनगर २४.१९, अकोला ४.४०, भंडारा १.४७, चंद्रपूर २०.५२, धुळे २.२०, गडचिरोली १०.२६, गोंदिया ६.६०, जळगाव २४.९२, कोल्हापूर ३२.९९, नागपूर ११, नंदुरबार ३.६७, नाशिक २०.५२, पालघर २.९३, पुणे २८.५९, रत्नागिरी १८.३३, सांगली २७.८६, सातारा २९.३२, सिंधुदुर्ग ४.४०, सोलापूर ३२.९९, ठाणे ०.७३, वर्धा २.९३, वाशिम २.२० आणि यवतमाळ जिल्ह्यातून ८.८० कोटी, असा एकूण ४२०.७८ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे.

ज्या जिल्हा परिषदांनी मागील दीड महिन्यांपूर्वी दिलेला निधी खर्च केला नाही त्यांचा निधी काढून घेतला आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदांना निधी दिला, तो कायम आहे. केंद्राकडून जलजीवन मिशन योजनेसाठी निधी मिळतो. त्यातील ७५ टक्के वेळेत खर्च केला नाही तर पुढील निधीस विलंब होतो. जिल्हा परिषदांनी जास्तीत जास्त निधी खर्च करावा, केंद्राकडून २० दिवसांत आणखी निधी मिळणार असून, तो जिल्हा परिषदांकडे वर्ग केला जाईल. - डॉ. अमित सैनी, अभियान संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी