शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 7:01 AM

२०१९ मध्ये चार वादळे : सागरी आपत्ती जाहीर करण्याची मच्छीमारांची मागणी

सागर नेवरेकर 

मुंबई : वातावरण बदलामुळे गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे येऊन धडकली. या वर्षी समुद्रात चार मोठी वादळे येऊन गेली. या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित सागरी मासेमारी आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

समुद्रात या पूर्वी १० वर्षांमध्ये चार ते पाच वादळे येत होती, परंतु २०१० ते २०१९ दरम्यान अरबी समुद्रात १७ वादळे येऊन गेली, तर फक्त २०१९ मध्ये अरबी समुद्रात एकूण चार वादळे येऊन गेली. एकाच वेळी समुद्रात दोन वादळे ही १२५ वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर, या वर्षी अरबी समुद्रात ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी दोन वादळे एकाच वेळी धडकली. या वादळांमुळे शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांचेही नुकसान झाले असून, आॅगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडला आहे. त्यामुळे मच्छीमारांवर आर्थिक आपत्ती ओढावली गेली आहे. शासनाने मच्छीमार बांधवांच्या आर्थिक नुकसानाकडे लक्ष देऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार संस्था व संघटनांनी केली आहे.अद्याप ठरवले नाहीत निकषजागतिक तापमानात वाढीमुळे अनेक नैसर्गिक संकटे एकापाठोपाठ येऊन धडकत आहेत. मनुष्यच कुठेतरी याला जबाबदार आहे. अरबी समुद्रात जी मोठी वादळे निर्माण होत आहेत. ती पूर्वी पॅसिफिक महासागरात दिसून यायची. या वर्षी अरबी समुद्रात चार मोठी वादळे भारतीय भूखंडामध्ये येऊन गेली आहेत. चार वादळांपैकी तीन वादळे ही हंगामामध्येच येऊन गेली आहेत. त्यामुळे मच्छीमारावर उपासमारीची वेळ आली आहे. दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईची फक्त चर्चा केली जाते. मात्र, अद्यापही कोणतेही निकष, श्रेणी ठरविले गेलेले नाहीत.- हेमंत गौरीकर, अध्यक्ष,रायगड जिल्हा मच्छीमार कृती समिती.अरबी समुद्रात आलेली शतकातील वादळेवर्षे वादळांचीसंख्या१८०० ५१९००-४९ १०१९५० ३१९६० ६१९७० १११९८० २१९९० ६२००० ५२०१०-१९ १७उपासमारीची वेळराष्ट्रीय मच्छीमार परिक्षेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, मच्छीमारांसाठीच्या सुविधा, विविध योजना, आर्थिक मदत आणि विकास इत्यादींमध्ये काळानुसार बदल होत गेले, परंतु जास्त व्याज आकारणाऱ्या योजनेतून कित्येक मच्छीमार भरडले गेले. आता अरबी समुद्रात पाठोपाठ येणाºया वादळांमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वादळाची चाहुल लागली की, अगोदरच हवामान खाते आणि कोस्ट गार्ड मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखतात, तसेच मच्छीमारांच्या मोबाइलवर मेजेस पाठवितात. नैसर्गिक आपत्ती काळात ज्या शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात, तशा मच्छीमारांसाठी कोणत्याही सुविधा सरकारकडून दिल्या जात नाहीत. 

टॅग्स :MumbaiमुंबईCyclone Gajaगाजा चक्रीवादळ