शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार

By अतुल कुलकर्णी | Updated: March 9, 2018 04:43 IST

राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

- अतुल कुलकर्णीमुंबई - राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वित्तमंत्री मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. बजेटवर अंतिम हात फिरवल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. यावर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकरी, उद्योग, सामाजिक न्यायाच्या विविध योजनांना न्याय देणारा आणि राज्यात रोजगार वाढविणारा असेल असेही ते म्हणाले. राज्याने ज्यादा व्याज दराने कर्ज घ्यायचे, तो पैसा विविध विभागांना त्यांच्या योजनांसाठी द्यायचा आणि त्या विभागांनी तो खर्च न करता कमी व्याज दराने पुन्हा बँकांमध्ये ठेवीच्या रुपाने ठेवतात.परिणामी राज्याचे नुकसान होते असे सांगून अर्थमंत्री म्हणाले, ही सगळी रक्कम मुख्य बजेट मध्ये आणली जाईल व जशी गरज असेल तशी ती विविध विभागांना दिली जाईल.आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावर मोठे कर्ज आहे.व्याजासाठी किती रुपये द्यावे लागतात?राज्यावर जरी मोठे कर्ज असले आणि व्याजापोटी दरवर्षी ३० हजार कोटी रुपये द्यावे लागत असले तरी कर्जाचे हे प्रमाण उत्पनाशी सांगड घालूनच केलेले आहे.शेवटी जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या पायाभूत सोयीसाठी आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जर कर्ज काढले तर त्यात चुकीचे काहीच नाही. २००७-०८ साली कर्जाचे प्रमाण २५.५ होते जे आज १६.६ आहे. पण गेल्या २० वर्षांत जेवढ्या पुरवणी मागण्या झाल्या नाहीत, तेवढ्या या वर्षात झाल्या. नियोजनाच्या अभावातून हे झाले का?- पुरवणी मागण्या या विक्रमी होत्या हे मान्य आहे. ते तर्कसंगत वाटणारही नाही. पण गेल्यावर्षी पासून आपण प्लॅन व नॉनप्लॅन असे बजेट नीति आयोगाच्या शिफारशीमुळे एकत्र केले. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या एकत्रीत योजनांना द्यावा लागणारा राज्याचा हिस्सा त्यावेळी निश्चित झाला नव्हता. तो जसा जसा होत गेला तशा पुरवणी मागण्या कराव्या लागल्या. शिवाय कर्जमाफी, गारपीट यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली. पण यामुळे विविध विभागांच्या निधीला ३० टक्के कट लावला गेला? ३० टक्के नाही, १० ते २०टक्के कट लावला गेला. हे आमच्याच काळात नाही तर आधीपासून हे होत आले आहे. परिस्थितीनुरुप ते करावेही लागते. पण हे करताना डीपीडीसी, आमदार निधी, कुपोषण, आरोग्य या विभागांना कट लावला नव्हता. बजेटमधून जनतेला काय मिळणार?शेतकरी, तरुण बरोेजगार आणि सामाजिक न्यायासाठीचे हा अर्थसंकल्प असेल. आपला तरुण राज्यातच नाही तर रेल्वे, बँका, मिल्ट्री या माध्यमातून देशभरात रोजगारासाठी जावा यासाठीचे वातावरण देणारा हा अर्थसंकल्प असेल.कोणत्या विभागाकडे किती डिपॉझिट ?ही आकडेवारी मोजक्या विभागांची आहे.विविध जिल्हापरिषदा 17000एमएमआरडीए 16500सिडको 8000बांधकाम बोर्ड 6000जलसंपदा 5500एमआयडीसी 5500

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्रSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDeepak Kesarkarदीपक केसरकर