शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कांदा अनुदानाचे ३८५ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:35 IST

राज्यात आतापर्यंत ११२ कोटी वाटप; नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम

ठळक मुद्दे दर घसरल्याने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकºयांना ३८५ कोटी रुपये अनुदानापोटी देय आहेतआतापर्यंत ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे सांगण्यात आले

सोलापूर: दर घसरल्याने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकºयांना ३८५ कोटी रुपये अनुदानापोटी देय आहेत. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम आहे. आतापर्यंत ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. पाऊस कमी पडल्याने पाण्याची वानवा असताना शेतकºयांनी अन्य पिकांना फाटा देत कांद्याचे उत्पादन घेतले. कमी कालावधीत अधिक पैसे मिळतील, या भावनेतून सगळीकडे कांद्याचे पीक घेतले. अमाप उत्पादन झाल्याने कांद्याचे दर आॅक्टोबरनंतर घसरण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात दरात अधिकच घसरण झाली. त्यानंतर कांदादर काही सावरला नाही. शासनाने प्रति क्विंटल २०० रुपये व एका शेतकºयाला दोनशे क्विंटलपर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले. 

सुरुवातीला नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्यासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी ११५ कोटी रुपये बाजार समित्यांना दिले. त्यापैकी ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत. 

त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या अर्जानुसार राज्यभरातील बाजार समित्यांनी जिल्हा उपनिबंधकांमार्फत अनुदानाची मागणी केली आहे. राज्यातून ३८५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. पणन मंडळाने ही रक्कम शासनाकडे केली असून अद्याप शासनाकडून काहीच रक्कम मिळाली नाही. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांची सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून निधी आल्याशिवाय शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. 

खरीप पेरणीसाठी पैशाची गरज - पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांना खरीप पेरणीची ओढ लागली आहे. कांद्याचे अनुदान मिळाले तर खरीप पेरणीसाठी ही रक्कम उपयोगात येणार आहे. पाण्याअभावी बहुतांशी बागायती क्षेत्र सध्या कोरडे पडले आहे. चांगला पाऊस पडल्यास या क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यास सोयीचे होणार आहे. मात्र, कांदा अनुदान शासनाने दिले तरच.. 

सोलापूरसाठी ३७ कोटींची मागणी- सोलापूर जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७० लाख ३० हजार रुपयांची मागणी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केली आहे. ३३ हजार ११८ शेतकºयांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करावयाची आहे. शेतकºयांची बँक खाती तयार असून, शासनाकडून पैसे आल्यास तत्काळ खात्यावर जमा करण्याची तयारी बाजार समित्यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना